केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाजी बातमी

नवी दिल्ली : अक्षय तृतीयेआधी आणि नव्या आर्थिक वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाचा दिवस ठरला. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ केली आहे. याचा फायदा केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. या निर्णयामुळे आता पगारात वाढ होणार आहे. दुसरीकडे आठव्या वेतन आयोगाबाबतही मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या या निर्णयामुळे लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळणार आहे. वाढत्या महागाईच्या काळात 2 टक्क्यांची ही वाढ कर्मचाऱ्यांच्या महिन्याच्या पगारात महागाईच्या काळातही मोठी वाढ करणारी ठरणार आहे. महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या राहणीमानाचा खर्च आणि महागाईचा दर लक्षात घेऊन दर काही महिन्यांनी सुधारला जातो. केवळ महागाई भत्ताच नाही, तर आता कर्मचारी संघटनांनी वेतन रचनेत आमूलाग्र बदल करण्याची मागणी लावून धरली आहे. नॅशनल कौन्सिल-जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीने सरकारला सादर केलेल्या निवेदनात काही महत्त्वाचे प्रस्ताव मांडले आहेत.

