नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात प्रवासाचा अनुभव सुलभ करण्यासाठी, रेल्वेने दिवाळी आणि छठ दरम्यान प्रवाशांची वाढलेली गर्दी व्यवस्थापित करण्यासाठी विक्रमी संख्येने विशेष गाड्या चालवण्याची योजना निश्चित केली आहे.
दि. 1 ऑक्टोबर ते दि. 15 नोव्हेंबर या काळात, दिवाळी आणि छठ उत्सवादरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ऐनवेळी गर्दी टाळण्यासाठी रेल्वे 12,000 विशेष गाड्या चालवणार आहे, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी येथे सांगितले. येथे एका पत्रकार परिषदेत, रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांच्या उपस्थितीत बोलताना, ते म्हणाले की, गेल्या वर्षी या सणांदरम्यान 7,500 विशेष गाड्या चालवण्यात आल्या होत्या. मंत्र्यांनी जोडले की, आतापर्यंत 10,000 विशेष गाड्यांची सूचना देण्यात आली आहे, आणि आवश्यक असल्यास, कमी वेळेत त्वरित तैनातीसाठी अतिरिक्त 150 पूर्णपणे आरक्षित नसलेल्या गाड्या तयार ठेवल्या जातील. वैष्णव यांनी असेही सांगितले की, माल्दा, नागपूर, कोटा, रांची, जयपूर, राजकोट, बिकानेर आणि अहमदाबादसह 29 रेल्वे विभागांनी ट्रेनच्या कामकाजात 95 टक्के वेळेचे पालन साधले आहे. त्यांनी असाही दावा केला की, रेल्वे मंत्रालय सर्व 70 विभागांमध्ये 100 टक्के वेळेचे पालन साधण्यासाठी अथकपणे काम करत आहे.



