पाटाच्या पाण्यात बुडून १० वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू,

0

 

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

यावल तालुक्यातील साकळी येथे दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा गावालगत असलेल्या पाटचारीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी दुपारी घडली असुन घटनेची माहिती मिळताच त्याला यावल रूग्णालयात आणले आणि संबंधित घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, साकळी ता. यावल येथील आंबेडकर नगरातील रहिवासी निखील मुकुंदा सोनवणे (१६) हा इयत्ता १० वीचा विद्यार्थी गावालगत असलेल्या हतनुरच्या पाटचारी जवळ गेला होता. पाटचारीत पाणी असल्याने तो पोहण्यासाठी पाणीत उतरला मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला, त्यात त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच नागरीकांनी घटना स्थळी धाव घेतली व निखील सोनवणे यास पाण्यातुन काढून, साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर यावल ग्रामिण रूग्णालयात आणले. येथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषीत केले. या प्रकरणी यावल पोलिसात ऋतम सोनवणे यांनी दिलेल्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.