जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील भादली येथील माहेरवासी असलेल्या विवाहितेला ५० हजार रूपये माहेरहून आणावे, यासाठी पतीसह सासू व सासऱ्यांकडून छळ केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक येथील माहेर असलेल्या प्रतिमा रविंद्र पारधे यांचा विवाह भुसावळ तालुक्यातील साकरी येथील रविंद्र रामा पारधे यांच्याशी २१ जुन २०१२ रोजी रितीरिवाजानुसार झाला. लग्नानंतर एक महिना चांगला गेला. त्यांना एक मुलगी झाली. त्यानंतर मुलांचे पालन पोषण करण्यासाठी माहेरहून ५० हजार रूपये आणावे यासाठी पती रविंद्र पारधे यांनी मारहाण केली.
तर सासू दगडाबाई रामा पारधे आणि सासरे रामा गणपत पारधे रा साकरी ता. भुसावळ यांनी विवाहितेला आणि वडीलांना शिवीगाळ केली. हा छळ असह्य झाल्याने विवाहिता माहेरी भादली बुद्रुक येथे निघून आल्या. याप्रकरणी विवाहितेने ७ सप्टेंबर रोजी पतीसह सासू व सासरे यांच्याविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.