जम्मू-काश्मीरमध्ये २४ तासात ४ दहशतवाद्यांचा खात्मा

0

श्रीनगर :- जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या २४ तासात दहशतवादी आणि भारतीय जवान यांच्यात ४ चकमकी झाल्या आहेत. यातील एक चकमक शोपिया जिल्ह्यातल्या इमाम भागात अजूनही सुरू असून त्या ठिकाणी २ ते ३ दहशतवादी लपल्याची माहिती आहे. बांदीपोरा या ठिकाणी झालेल्या चकमकीत ‘लष्कर-ए-तोयबा’चे दोन दहशतवादी मारले गेले असून यात लष्करचा टॉप कमांडर अली भाई याचा खात्मा करण्यात जवानाला यश मिळाले आहे.

बारामुला जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते. २४ तासात चार चकमकी झाल्या असून आतापर्यंत ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तसेच या चकमकीत भारताचा एक अधिकारी आणि तीन जवान जखमी झाले आहेत. चकमकीत जखमी झालेल्या जवानांवर बादामीबागमधील लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चकमकीत मारला गेलेला अली भाई हा पाकिस्तानचा असल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं आसपासचा परिसर ताब्यात घेत सर्च ऑपरेशन सुरू केलं. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं.

Leave A Reply

Your email address will not be published.