हिंदूंच्या रक्तात स्वार्थापलीकडे कोणतीच गोष्ट नाही

0

भिडे गुरुजी यांचे परखड मत ; राष्ट्रीयत्व जोपासण्याचे आवाहन

जळगाव, दि.२७
प्रत्येकाला आपल्या देशाबद्दल ठाऊक असले पाहिजे , आपला इतिहासही ठाऊक असायला हवा मात्र दुर्दैवाने याबाबत कुणीच विचार करीत . आत्मीयता आपुलकी यापलीकडे महाराष्ट्रातील कणभर माणसांना देखील आपला इतिहास ठाऊक नाही असे माझे मत आहे . देशप्रेम म्हणजे रक्तात राष्ट्रीयत्वच्या पेशी नसतात त्यांच्या रक्तात स्वार्थापलीकडे कोणतीच गोष्ट नसल्याची खंत संभाजी भिडे यांनी आज आयोजित सभेत व्यक्त केली .
भिडे गुरुजी यांची सभा आज सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पटेल सभागृहात आयोजित करण्यात आली होती . यात भिडे गुरुजी यांचे ३२ मण सुवर्ण सिंहासन या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते . सभेला सुमारे पाचशेच्यावर कार्यकर्ते व चाहत्यांनी व्याख्यान ऐकण्यासाठी गर्दी केली होती . संभाजी भिडे यांच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .
यावेळी भिडे गुरुजी म्हणाले कि, बृहस्पती नावाचे ऋषी ३७ हजार वर्षांपूर्वी होऊन गेले. त्यांनी माणसाने कसे वागावे यावर बरेच खंड लिहिले आहेत . हिंदुस्थानचे वय किती यावर संत नामदेवांनी संत याचा अर्थ काय याबाबत सांगितले आहे. एक हे चार हजार वर्षांचे आहे . विठ्ठल २८ युगे उभा असून सत्ययुग, त्रेतायुग आणि कलियुग असे चार युग असून २८ युगे विठ्ठल उभा आहे. १४० हजार वर्षांचा हा हिंदुस्थान देश असून जपान, चीन, इंडोनेशिया, इराक, इराण, ब्रह्मदेश, नेपाळ, भूतान अफगाणिस्थान, अरबस्थान तुर्कस्थान या आपल्या देशाच्या सीमा होत्या . कन्या ते काश्मीर या आपल्या मोठ्या देशात अतिशय सुपीक जमीन लाभली आहे खनिज संपत्ती,वनसंपत्ती,पशु संपत्ती,आणि बुद्धिमानशास्त्रज्ञ देशाला लाभले आहे. नसांमध्ये १० भारतीय हिंदू आहेत . जीनिव्हामध्येही भारतीय हिंदू आहेत . परंतु विदेशात राहणार्‍या हिंदूंना देशप्रेम नाही . १४७ देशांपैकी ७६ देशांनी आपल्या देशावर आक्रमण केले आहे . मात्र आपला देश राहणार देश आहे . हिंदूंच्या रक्तात कशासाठी व कुणासाठी जगायचे स्वार्थापलीकडे कोणतीच किंमत नसते . देशप्रेम म्हणजे राष्ट्रीयत्व परंतु रक्तात राष्ट्रीयत्वाच्या पेशी नसतात . धरती माती, जाती रूढी परंपरा आपली संस्कृती या गोष्टींसह स्वतःच्या जीवाइतका कोणावर प्रेम करणारा हिंदू नाही असे मत भिडे गुरुजी यांनी व्यक्त केले . चीन निखळ शत्रू असून १९६२ साली १ लाख ८४ हजार प्रदेश काबीज केला होता . मात्र चिनी नूडल्स आणि चिनी वस्तू आपण वापरत असतो . पाकिस्तानही आपला कट्टर शत्रू आहे . मात्र ज्यांना याबाबत कळत नाही ओळखत नाही अशा मूर्ख लोकांचा आपला देश असल्याची टीका भिडे गुरुजी यावेळी केली . खावे आंनदाने जगावे आणि एक दिवस निघून जावे प्रवृत्ती असल्याचे त्यांनी यावेली सांगितले .

Leave A Reply

Your email address will not be published.