हिंगोणा ते न्हावी रस्त्याची दुरवस्था ; लोकप्रीतीनिधींनी लक्ष देण्याची मागणी

0

हिंगोणा ता. यावल- हिंगोणा ते न्हावी तसेच मारूळ फाटे गावापर्यंतच्या मार्गावरील रस्त्याची ठीकठिकाणी खड्डे पडल्याने अत्यंत दुरवस्था झाली असुन , रसत्याच्या झालेल्या या दुर्दशेमुळे वाहन चालकासह नागरीकांना मोठा त्रास सोसावा लागत आहे . हिंगोणा ते न्हावी तसेच मारुळ या प्रमुख मार्गाला जोडणारा फाट्यापर्यंतच्या संपुर्ण सुमारे चार किलोमिटरच्या रस्त्याची मागील दोन वर्षापासुन ठीकठीकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने नागरीकांना वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे . हिंगोणा ते न्हावी मार्ग खिरोदा असा हा मुख्य रस्ता रावेर – यावल तालुक्याचे आमदार शिरीष चौधरी यांचा खिरोदा गावाला जातो. यासाठी नागरीकांना महत्वाच्या मार्गाशी जोडणारा हा एक प्रमुख मार्ग असुन या मार्गावरील रस्त्याकडे लोकप्रतिनिधी यांनी तात्काळ लक्ष देवुन या रस्त्याच्या प्रश्नास मार्गी लावावा अशी मागणी नागरीकांकडुन होत आहे . त्याचप्रमाणे हिंगोणा ते न्हावी. रस्त्याची मागील तिन वर्षापासुन अत्यंत बिकट अवस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे असे चित्र निर्माण झाल्याने परिसरातील वाहनधारक , शेतकरी शेतमजुरआणी पादचाऱ्यांना या मार्गावरील रस्त्याने वावरतांना मोठा त्रास सहन करावा लागत असुन , या मार्गाचा प्रश्न लोकप्रतिनिधीनी लक्ष घालुन सोडवावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करीत आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.