शेतकऱ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथीलसुखदेव हिलाल पाटील (वय ४८) या शेतकऱ्याचा विहिरीत पडून पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुखदेव पाटील हे सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास आपल्या शेतात गेले होते. दुपारी ते पाणी घ्यायला जवळच्या  शेतातील विहिर असलेल्या ठिकाणी गेले. मात्र विहीरीतून पाणी काढत असतांना त्यांचा तोल जावुन ते विहीरीत पडले. त्यातच पाण्यात बुडून त्यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी उघडकीला आली आहे.

दरम्यान ते पाणी घेऊन परतले नसल्याने घरच्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेत असतांनाच धना अहिरे यांच्या शेतातील विहीरी जवळ सुखदेव पाटील यांचे बुट दिसून आले. त्यावर विहीरीत शोध घेण्यात आले असता सुखदेव पाटील यांचा मृतदेह आढळून आला.

या घटनेमुळे  परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुखदेव पाटील यांचा मृतदेह ग्रामीण महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. शवविच्छेदन झाल्यावर वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोना सुर्यकांत नाईक हे करीत असून मयताच्या पाश्चात्य पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.