चाळीसगाव,दि. 18-
चाळीसगाव तालुक्यात बलराम व्यायाम शाळेच्या पटांगणावर आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परीवर्तनाचा संपर्क यात्रे दरम्यान राज्यांचे माजी बांधकाम मंत्री व ओ.बी.सी नेते छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रातील फडणवीस सरकार यांनी शेतकर्यांच्या पिक विम्यात फार मोठा घोटाळा केला असून तो राफेल घोटाळा पेक्षा मोठा घोटाळा आहे, आणि या सर्व घोटाळ्याची रक्कम अदानी, आणि अंबानी यांच्या घशात टाकली असा खळबळजनक आरोप केला.
यावेळी व्यासपीठावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महिला अध्यक्षा चित्राताई वाघ , माजी खासदार वसंतराव मोरे, माजी आमदार दिलीप वाघ, विकास पाटील, तसेच चाळीसगाव चे माजी आमदार राजीव देशमुख उपस्थित होते.
प्रास्तविक भाषणात माजी आमदार राजीव देशमुख यांनी चाळीसगाव पासून ते दिल्ली पर्यंत घोषणा व थापा मारणारी पलटण जमली आहे, चाळीसगाव तर सोडा जळगाव जिल्ह्यात एक तरी महत्त्वाकांक्षी प्रकल्प दाखवा अशी अवस्था आहे, आमदार व खासदार यांनी तालुक्यातील दत्तक घेतलेल्या गावांची अवस्था काय आहे ते पहा, आता राहिलेल्या चार महिन्यांत नूसता गाजराचा पाऊस पडेल,
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात चौफेर फटकेबाजी केली त्यांनी 2014 मध्ये मोदी यांनी दिलेली अच्छे दिनची भुलभुलैया घोषणा, या देशात ना शेतकरी ला अच्छे दिन आले ना सुशिक्षित बेरोजगारांना,ना कामगारांना, फक्त अच्छे दिन आले राज्यातील चार वर्षांत सोळा मंत्री भष्टाचाराच्या आरोपांच्या फेरात अडकले, यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, जयंतराव पाटील, माजी उपमुख्यमंत्रीअजित पवार यांचे जोरदार भाषण झाली.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.