विवरे ता. रावेर (प्रतिनिधी) : येथील तलाटी नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. येथील गेल्या दहा महिन्यापूर्वी तलाटी उमेश बागुळ यांची चिनावल या गावी बदली झाली आहे. अद्याप विवरेबु॥ गावाला तलाटीच मिळालेले नाही. वांरवार मागणी करून सुधा प्रशासनना जाग आलेली नाही.
गाव मोठा असुन दोन्ही गावांचा कार्यभार विवरे खुर्दचे तलाटी तेजेस पाटील यांचेकडे आहे. ७ /१२ उतारे, शासकीय कामासाठी लागणारे कागद, शेतकऱ्या साठी शासकिय योजनेची माहिती, नविन खरिदी विक्रिझाल्यास नोंदी वगैरे इत्यादी कामाचामोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी याकडे बाबीकडे कमीत कमी लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घ्यावा व गावत कायमस्वरूपी तलाटीची नेमणुक करावी आशी मागणी केली जात आहे.