लोकशाहीच्या मजबुतीकरणासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा – प्रांताधिकारी रामसिंग सुलाने

0

भुसावळ (प्रतिनिधी)- सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या 12 भुसावळ (अ.जा.) मतदार संघामधील बीएलओ, सुपरवायझर्स, तलाठी, ग्रामसेवक,क्षेत्रिय अधिकारी, कृषी सहाययक यांची बैठक  दिनांक 09/10/2019 रोजी सकाळी 11 वा लोणारी समाज मंडळ,भुसावळ येथे आयोजीत करण्यात आली होती. या सभेस  रुपककुमार मुजुमदार, निरिक्षक व  रामसिंगसुलाणे, निवडणूक निर्णय अधिकारी, 12 भुसावळ (अ.जा.) विधानसभा मतदार संघ यांनी मार्गदर्शन केले.

प्रथम  रुपककुमार मुजुमदार, निरिक्षक यांचे स्वागत  रामसिंग सुलाणे यांनी पुष्पगुच्छ देवुन केले. रामसिंग सुलाणे, निवडणूक निर्णय अधिकारी, 12 भुसावळ (अ.जा.) विधानसभा मतदार संघ यांनी प्रस्ताविक केले त्यात त्यांनी सांगितले की आपण सर्वानी निवडणूकीच्या कामात स्वताला झोकुन दिले आहे. आपण निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखाली काम करीत आहोत. आपली जबाबदारी काय व आपण कसे काम केले पाहीजे. या बददल उपस्थितांना मार्गदर्शन केले. हे काम पारदर्शक पणे व निपक्षपातीपणे पार पाडणे महत्वाचेआहे. असे सांगितले तसेच त्यांनी सांगितले की, वृध्द, अपंग, गर्भवती महिला, स्तनदामाता, इ. साठी आवश्यकता असल्यास मतदानाला येणे साठी वाहने पुरविली जातील, सी व्हीजेल अॅप तयार केले असून कुठेही गैर प्रकार आढळल्यास त्याचे शुटिंग करुन आपण तक्रार नोंदवू शकतात असेही सांगितले. तसेच नमुना 12 मध्ये कर्मचाऱ्यानी आपले मतदान नोंदवावे असेही त्यांनी आवाहन केले आहे, तसेच  रुपककुमार मुजुमदार यांचा मोबाईल क्रमांक 9423701478 असल्याचे सांगितले.

रुपककुमार मुजुमदार निरिक्षक यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, भुसावळ विधानसभा मतदार संघात पुर्वी साधारण पणे 52-53 टक्के मतदान व्हायचे ते आता 75 टक्के कसे होईल यासाठी आपण प्रयत्न करायचे आहे. आपण आतापर्यंत दुरदर्शन, रेडीओच्या माध्यमातुन, शाळामध्ये जाऊन क्विझ कॉम्पिटीशन घेवुन, निवडणूकीची मशीनस गावो गावी फिरवुन निवडणूकी बाबत माहिती दिली आहे. गर्भवती महीला स्तनदान माता, वयस्कर लोक , अपंग, 18 वर्षाचे नवीन मतदार यांना मतदानासाठी आणावे. म्हणजे वेळेत मतदान पुर्ण हाईल व 75 टक्के मदतान होईल. तसेच मतदान जागृतीसाठी फुगे लावणे हातात बॅन्ड लावणे, दुपारी 12 ते 5 पर्यंत आपआपल्या  विभागात वॉर्ड मध्ये फिरुन ज्याचे मतदान राहीले असेल त्यांना मतदान करण्याचे आवाहन करावे, दिनांक 21 रोजी प्रत्येक गावात प्रभात फेरी काढून मतदान करण्याचे आवाहन करावे. तसेच त्यांनी उपस्थित कर्मचारी यांना काहि सुचना असल्यास दयाव्यात असे सांगितले.

रुपककुमार मुजुमदार यांनी मतदार जनजागृती स्वाक्षरी मोहीमेचे स्वाक्षरी करुन उदघाटन केले त्यांनी आशा व अंगनवाडी वर्कस, बीएलओ यांचे मार्फत मतदान यशस्वीतेसाठी प्रयत्न करावे तसेच नवीन 18 वर्षावरील मतदारांना ब्रन्ड अम्बेसडर करुन त्यांचेमार्फत मतदारांना प्रोत्साहीत करुन मतदान करण्यास प्रवृत्त करावे असे सांगितले. नंतर निवडणूक निर्णय अधिकारी व निरिक्षक यांनी पत्रकार परिषदेत  मतदानाची टक्केवारी कशी वाढेल या बाबत मिडीया मार्फत जनजागृती करावी असे पत्रकारांनाही  आवाहन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.