राष्ट्रवादीचे ९ आमदार संपर्कात; भाजपच्या खासदाराचा खळबळजनक दावा

0

मुंबई :  राज्यात कोणत्याही पक्षांना सत्ता स्थापनेचा पेच सोडवता न आल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती लागवटीचा निर्णय घेतला. त्यानंतरही युती व आघाडीतील पक्षांना सत्तास्थापनेची संधी असल्यानं जुळवाजुळव सुरूच आहे. अस असतानाच राष्ट्रवादीचे नऊ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर केला आहे.

राज्यातील सत्ता संघर्ष अधिकच वाढत चालला आहे. शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी मिळून सत्ता स्थापन होणार असल्याची चर्चा आहे. तसे प्रयत्न तिन्ही पक्षाकडून होत आहे. मात्र तिन्ही पक्षातील ठोस बोलणी अद्याप होऊ शकले नसल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालेला नाही.

दोन दिवसापूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीची भूमिका भाजपचे सात आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट केले होते. अजित पवारांच्या या दाव्यावर खासदार निंबाळकरांचा विचारले असता भाजपचा एक आमदार पक्ष सोडून जाणार नाही उलट राष्ट्रवादीचे नऊ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केल्याने खळबळ उडाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.