मुंबई | कोरोना विषाणुने राज्यात आता चांगलेच पाय पसरले आहेत. मुंबई, पुण्यासारख्या शहरांसोबतच ग्रामिण भागातही कोरोनारुग्ण सापडू लागल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आज १ हजार पार गेली आहे.
मागील २४ तासांत राज्यात कोरोनाचे १५० नवीन रुग्ण सापडले आहेत. सध्या राज्यातील एकुन कोरोना बाधित रुग्णांची संख्या १०१८ झाली आहे. यामध्ये मुंबईत ११६ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर पुण्यात १८, अहमदनगरमध्ये ३, बुलढाणा २, ठाणे २, नागपूर ३, सातारा १, औरंगाबाद ३, रत्नागिरी १, सांगली १ असा तपशील आहे. आतापर्यंत ७९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे असं राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
दरम्यान देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. देशात आतापर्यंत 4789 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 124 लोकांचा मृत्यू झाला आहे. 353 रूग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.