रांजणगाव फाट्याजवळ कंटेनर दुचाकी अपघातात दोन मजूर जागीच ठार

0

चाळीसगाव:-(प्रतिनिधी )चाळीसगाव येथून जाणार्या औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील रांजणगाव फाट्याजवळ कंन्टेनर व दुचाकी चा समोरासमोर झालेल्या अपघातात ठिंबकचे काम करणारे करजगाव पिंपरी ता. पाचोरा येथील दोन शेतमजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे.
 या अपघाता प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला कंटेनरच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अक्षय शिवाजी पाटील (21) व सुरेश नारायण पाटील (36) अशी अपघातात मरण पावलेल्या मजुरांची नावे आहेत.
 अक्षय शिवाजी पाटील व सुरेश नारायण पाटील दोघे रांजणगाव येथे शेतात ठिबक चे काम करण्यासाठी आले होते ते काम आठवून रांजणगाव येथून चाळीसगाव कडे दुचाकीने येत असताना चाळीसगाव औरंगाबाद महामार्गावर रांजणगाव फाट्याजवळ कन्नड कडून चाळीसगाव कडे येणाऱ्या भरधाव कंटेनरने (एच आर ५५ एसी १८०८ )त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली यात दोघेही लांब अंतरावर फेकले गेल्याने त्यांना गंभीर मार लागल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. कंन्टेनर चालकांनी जखमींना कुठल्याही प्रकारची मदत न करता तेथून पळ काढला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला कैलास धनराज कैलास पाटील राहणार कजगाव तालुका पाचोरा यांच्या फिर्यादीवरून  कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास पीएसआय संपत आहेर करीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.