यावल शहरात ४९ वर्षीय व्यक्तीचा ट्रॅव्हल बसवरून खाली पडल्याने मृत्यू

0

यावल (प्रतिनिधी): शहरातील एका ४९ वर्षीय इसमाचा उभ्या असलेल्या ट्रॅव्हल बसच्या टफावरील कॅरीयरवर केळीचे पानं ठेवतांना तोल जावुन खाली पडल्याने मृत्यू झाला ही घटना गुरूवारी सांयकाळी चार वाजेच्या सुमारास घडली मयत व्यक्तीचे नाव राजेंद्र ऊर्फ राजू मुकुंदा बारी असे असुन या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शहरातील जनता बँकेच्या मागील बाजुस असलेल्या बारी वाड्यातील रहिवासी राजेंद्र ऊर्फ राजू मुकुंदा बारी वय ४९ हे दररोज यावल येथुन धावणाऱ्या साईराम ट्रॅव्हल्सच्या बसेसव्दारे केळीचे पान पुणे पाठवण्याचा व्यवसाय करतात.

आज दि. १५ ऑक्टोबर गुरुवार रोजी चोपडा रस्त्यावरील महाजन पेट्रोल पंपावर ट्रव्हल्स क्रमांक एम. एच. १९ वाय. ६१११ ही उभी होती. तेव्हा रोजच्याप्रमाणे उभ्या असलेल्या या बसवरील टफावर चढुन कॅरीअरवर बारी हे केळीचे पानाचे गठ्ठे बांधत होते.

बारी हे पुणे येथे संगमवाडीमधील नातेवाईक आशा संतोष बारी यांच्या कडे पाठवत असत. मात्र चार वाजेच्या सुमारास बसच्या कॅरीवर केळी गठ्ठे टाकून बांधत असतांना अचानक खाली पडले व त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली हा प्रकार लक्षात येताच त्यांना जखमी अवस्थेत यावल ग्रामिण रुग्णालयात आणण्यात आले.

मात्र रस्त्याचं त्यांची प्राणज्योत मालावली. या प्रकरणी यावल पोलिसात बस चालक तेजस लहू पाटील रा. अमळनेर यांनी दिलेल्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार असलम खान करीत आहे. मयत बारी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार असुन त्यांच्या अशा अपघातील निधनामुळे शहरातुन हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.