जळगाव – मे महिन्यातील अखेरच्या दिवसांमध्ये उष्णतेच्या तडाख्यामुळे जिल्हावासीय बेजार झाले असून आज यावल, सावदा, विवरा, चिनावल, खिरोदा भागात अचानक वातावरण बदलल व अवकाळी पावसाने १० ते १५ मिनिट हजेरी लावली. पावसाच्या शिडकाव्यामुळं उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी का होईना दिलासा मिळाला.
तापमानाचा पारा चढत असतानाच पावसाच्या हजेरीमुळे अनेकजण सुखावले आहेत. दुपारच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात प्रचंड उकाडा होत होता पण, दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या पावसामुळे यावल, सावदा, विवरा, चिनावल, खिरोदामध्ये वातावरणात अल्हाददायक गारवा निर्माण झाला.