भुसावळ | प्रतिनिधी
बर्याच महिला घरातील काही दिवसांचे शिळे अन्न खातात त्यामुळे त्यांना विविध आजार होतात.महिलांनी ताजे व पौष्टीक आहारांचे सेवन करावे, असे प्रतिपादन आ.संजय सावकारे यांनी केले. ते आज दि.१६ सप्टेंबर रोजी खडका रोड भागातील कुरेशी हॉलमध्ये राष्ट्रीय पोषण मिशन अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनातर्फे आयोजित जनजागृती कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी आ.संजय सावकारे पुढे म्हणाले की, गर्भवती महिलांनी पोषण आहारा बाबत सर्वाधिक काळजी घ्यायला हवी. कमी असले तरी पौष्टीक व ताज्या आहाराचेच सेवन करावे. अल्पसंख्यांक समाज साक्षरतेत खुप पिछाडीवर असून शिक्षणाबाबत जनजागृतीची गरज आहे.मुस्लिम महिला आपल्या विविध आजारांवर उपचारासाठी पुरूष डॉक्टरांकडे जात नाही.त्यामुळे मुस्लिम समाजाने आपल्या मुले व मुलींना चांगले शिकवून डॉक्टर व इंजिनिअर करावे, जेणेकरून त्यांच्या भावी पिढ्या साक्षर तयार होतील. समाजाला सुधारण्यासाठी शिक्षणाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमास प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे,नगरपरिषद रूग्णालयाच्या महिला वैद्यकिय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर, डॉ.अर्शिया शेख, मुख्य सेविका आशा चव्हाण,वैशाली सावदेकर, उज्ज्वला खलाणेकर,पुनम पाटील,लता जाधव,मलेरियाचे तालुका पर्यवेक्षक सुनिल महाजन,डी.जी.चोपडे यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनिस व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर महिला पालकांनी बनविलेल्या विविध चविष्ठ खाद्य पदार्थांचा आ.सावकारे यांनी आस्वाद घेत तिघांना भेट वस्तू दिल्या. तसेच पहिल्या टप्प्यात २० अंगणवाड्यांसाठी आकार प्रशिक्षणाचे २० किट देण्याचे जाहीर केले. यानंतर खडकारोड परिसरात राष्ट्रीय पोषण मिशन व डेंग्यू बाबत जनजागृती करण्यात आली.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.