मुंबई : भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या १९५ पर्यंत पोहोचली आहे तर महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि पिंपरीत करोनाचे आणखी तीन रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५२ वर पोहोचली आहे. तसेच करोनाच्या ५ संशयित रुग्णांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला असून त्यांना डिस्चार्ज दिला जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
Maharashtra Health Minister Rajesh Tope: 3 people have tested positive for #Coronavirus – one each from Pimpri-Chinchwad, Pune & Mumbai. The total number of cases in the state now rises to 52. (file pic) pic.twitter.com/Hcg3ZmJdT6
— ANI (@ANI) March 20, 2020
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील करोना रुग्णांची माहिती दिली. राज्यातील १०३५ रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यांची टेस्ट करण्यात आली. त्यापैकी ९७१ रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. काल आणखी पाच जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. मात्र, या पाचही जणांवर १४ दिवस लक्ष ठेवण्यात येणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं. तसेच मुंबई, पुणे आणि पिंपरीत आणखी तीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या ५२वर पोहोचली असल्याचंही त्यांनी सांगितलं.