श्रीनगर :- भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. या हल्ल्यातील पाकिस्तानमधील बहुतांशी दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. यामध्ये २०० ते ३०० दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
भारताच्या हवाई दलाने पाकिस्तान हद्दीत घुसून मंगळवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास भारताच्या हल्ल्यात जैश- ए- मोहम्मद दहशतवादी संघटनेचे कंट्रोल रुम उद्ध्वस्त केले. या कारवाईत हवाई दलाने जैश- ए- मोहम्मदसह हिज्बुल मुजाहिद्दीन आणि लष्कर- ए- तोयबा या दहशतवादी संघटनांचेही तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटेचे कंट्रोल रुम अल्फा- ३ हे संपूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे समजते. भारतीय हवाई दलाने मिराज २००० विमानांनी हे एअर स्ट्राइक करत सुमारे २१ मिनिटे भारताच्या विमानांनी दहशतवाद्यांच्या तळांवर बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यात सुमारे २०० ते ३०० दहशतवादी मारले गेल्याचे समजते.
Abi to bhas survat he aage aage deko pakistan hi nahi bhachega.
i AM PROUD OF MY ARMY