नवी दिल्ली : पाकिस्तानच्या घुसखोरी करणाऱ्या सैन्याला भारतीय सैन्याने धुळ चारत कारगिल युद्धाचा शेवट केला तो आजचाच दिवस. आज संपूर्ण देशभरात कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येत आहे. कारगिल युद्धात आज म्हणजेच 26 जुलै रोजी 20 वर्ष पुर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील आपल्या कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यासाठी त्यांनी एक ट्विट केले आहे. या ट्टिटमध्ये त्यांनी कारगिर यात्रा ही अविस्मरणीय असल्याचे म्हटले आहे.
During the Kargil War in 1999, I had the opportunity to go to Kargil and show solidarity with our brave soldiers.
This was the time when I was working for my Party in J&K as well as Himachal Pradesh.
The visit to Kargil and interactions with soldiers are unforgettable. pic.twitter.com/E5QUgHlTDS
— Narendra Modi (@narendramodi) July 26, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये, 1999 मध्ये मला कारगिल युद्धाच्यावेळी कारगिलला जाण्याची आणि आपल्या साहसी सैन्याच्या जवानांसोबत एकजूटता दाखवण्याची संधी मिळाली होती. ही ती वेळ होती ज्यावेळी मी जम्मू काश्मिर आणि हिमाचल प्रदेशमध्ये पक्षासाठी काम करत होतो. कारगिल यात्रा खरोखरच अविस्मरणीय आहे. असे म्हटले आहे. दरम्यान, हे ट्विट करत असताना पंतप्रधानांनी काही फोटोदेखील शेअर केले आहेत ज्यामध्ये ते कारगिलला आणि या युद्धात जखमी झालेल्या जवानांना भेट देताना दिसत आहेत.