जळगाव । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने केलेली कामे आणि सर्वांच्या सहकार्याने आपल्याला यश मिळत आहे, अशी प्रतिक्रिया विजयाच्या मार्गावर असणारे उमेदवार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केली.
भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांचा दणदणीत विजय होत असून त्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतदानाच्या काही फेऱ्या झाल्यापासूनच जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. उन्मेष पाटील म्हणाले की, मोदींच्या विकासाला लोकांनी प्रतिसाद दिला आहे. तसेच स्थानिक नेते आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे फळ आहे.