दुचाकी चोरणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांना अटक

0

चार दुचाकी जप्त ; एलसीबीची कारवाई

जळगाव : – दुचाकी चोरणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांना आज एलसीबीच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. जामनेर शहरात तरुणांची टोळी चोरीच्या मोटरसायकली वापरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बापू रोहम यांना मिळाली होती. त्यानुसार सपोनि महेश जानकर, पोलीस निरीक्षक सुधाकर लहारे, हेकॉन्स्टेबल शरीफ काझी, युनूस शेख,सुरज पाटील,प्रकाश महाजन, विकास वाघ, दादाभाऊ पाटील, योगेश वराडे, गफूर तडवी, इद्रिस पठाण, दर्शन ढाकणे यांच्या पथकाने जामनेर येथील श्रीरामपेठ राकेश समाधान लोणारी वय २१ याची विचारपूस केली असता माझा मित्र चेतन संग्राम रा. शिरपूर व सागर शिरसाठ रा. बिडकीन यांनी तीन गाड्या चोरी केल्याचे सांगितले. दोघांना पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून एकूण एक लाख ३२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.