दिपनगर येथे चार विद्यार्थ्यींनींना विषबाधा !

0

चारही विद्यार्थिनीची प्रकृती स्थिर ; शारदा माध्यमिक विद्यालयातील घटना शिक्षकांनी दाखवली तत्परता

भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील दीपनगर येथील शारदा माध्यमिक विद्यालयातील चार विद्यार्थिनीना विषबाधा झाल्याने त्यांना त्वरित खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला असून आता या चार विद्यार्थिनिंची प्रकृती स्थिर आहे. मात्र, नेमके यांना नेमकी कोणत्या खाद्य पदार्थामधून विषबाधा झाली ,व भोवळ कश्या मुळे आली याचा उलगडा उशीरा पर्यन्त झाला नाही.

शुक्रवार रोजी शाळेत आले असतांना प्रार्थनेच्या वेळी या चारही विद्यार्थिनीना चक्कर आली व त्या एकागोमाग खाली कोसळल्या. यामुळे शाळा व परिसरात एकच धावपळ झाली. यावेळी शिक्षकांनी प्रसांगवधान राखत व तत्परता दाखवित या चारही विद्यर्थिनीना त्वरित दीपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्रा चे रुग्णालयात दाखल केले मात्र मुलींची प्रकृती बघता डॉक्टरांनी हलविन्यास सांगितले त्यानुसार भुसावळ येथील डॉ जगदीश अत्तरदे यांचे रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता उपचारादरम्यान यां चारही मैत्रीणिना आणले असता तपासनीत अन्नातुन विषबाधा झाल्याचे डॉ अत्तरदे यांचे निदर्शनात आल्याने या विद्यार्थिनीना गोदावरी रुग्णालयात पुढील उपचारा करिता पाठविन्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे सूत्राकड़ूंन समजते. परंतु या चार मैत्रीणिनी नेमके काय खाल्ले याचा उलगडा रात्री उशीरा पर्यंत झाला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.