तीन पॅसेंजर गाड्यां सुरु झाल्याने रेल्वे प्रवाशांना दिलासा

0

भुसावळ | प्रतिनिधी
सुमारे दोन महिन्यांपासून विविध तांत्रिक कामांमुळे बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या आज रविवार दिनांक २१ एप्रिल पासून सुरू होत असल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळला आहे.सुरु झालेल्या या गाड्यांमध्ये दररोज पहाटे साडेसहा वाजता सुटणारी भुसावळ-नरखेड, सकाळी ९ . ३० वाजता सुटणारी भुसावळ-कटनी-आरी व दुपारी अडीच वाजता सुटणारी भुसावळ-वर्धा पॅसेंजरचा समावेश आहे.
गेल्या महिनाभराचे कालावधी दरम्यान विविध कामांसाठी रेल्वे प्रशासनाने ब्लॉक घेतला होता. हे काम पूर्णत्वास येत असून रविवारी सुरुवातीला तीन गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला तर भुसावळ-देवळाली व भुसावळ-मुंबई येत्या दोन दिवसात सुरू होण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाकडून वर्तवण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.