जिल्ह्यासाठी सर्वात मोठा दिलासा ! चार महिन्यांतील सर्वाधिक निच्चांकी आकड्याची नोंद

0

जळगाव प्रतिनिधी । कोरोना संसर्गात जिल्ह्याच्या दृष्टीने सोमवारचा दिवस सर्वाधिक दिलासादायक ठरला. नव्या बाधितांमध्ये गेल्या चार महिन्यांतील सर्वाधिक निचांकी आकड्याची नोंद आज झाली. जिल्ह्यात दिवसभरात केवळ ३४ रुग्ण आढळून आले, तर १०४ बरे झाले. दरम्यान,  जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या अहवालात जिल्ह्यात तब्बत नऊ तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहे.

जळगाव जिल्ह्यात मे- जूनपासून वाढलेला कोरोनाचा संसर्ग सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये नियंत्रणात येत असल्याचे चित्र दिसत आहे. सप्टेंबरच्या १७ तारखेनंतर सातत्याने नव्या कोरोना बाधितांचा आकडा घटत असून संसर्गाचा आलेखही खाली येत आहे. जगात काही ठिकाणी कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यामुळे कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत जात आहे. परंतु, जळगाव जिल्‍ह्‍यासाठी सध्या तरी दिलासादायक चित्र आहे.

आजची आकडेवारी

जिल्हा प्रशानाकडून आलेल्या आकडेवारीत पाचोरा, भडगाव, धरणगाव, यावल,एरंडोल, जामनेर, पारोळा, चाळीसगाव आणि बोदवड तालुक्यात रूग्ण निरंक आले आहेत. तर जळगाव शहर-२, जळगाव ग्रामीण-५, भुसावळ-१४, अमळनेर-१, चोपडा-२, रावेर-२, मुक्ताईनगर-८ असे एकुण ३४ रूग्ण बाधित आढळून आले आहे.

जिल्ह्यात एकुण ५३ हजार २६५ रूग्ण बाधित आढळून आले आहे. त्यापैकी ५१ हजार २७६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ७२० रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज १ रूग्णाचा मृत्यू झाला असून एकुण १ हजार २६९ रूग्णांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यातील रिकव्हरी रेट हा ९६.२७ टक्क्यांवर येवून पोहचला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालात नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.