जिल्ह्यात आज १० तास वीज बंद

0

जळगाव – पावसाळा सुरु होण्याअगोदरच महावितरण कडून विद्युत यंत्रणेचे तांत्रिक देखभाल व दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. या कामासाठी आज जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये सुमारे चार ते दहा तास वीजपुरवठा बंद राहणार आहे. वीजग्राहकांनी सहकार्य करावे, वेळेच्या आत कामे पूर्ण झाल्यास त्वरित वीजपुरवठा सुरु करण्यात येईल, अशी माहिती महावितरणच्या जळगाव परिमंडळ कार्यालयातर्फे देण्यात आली आहे. दरम्यान वीज नसल्याने मे हिट व उकाडा असा दोन्ही बाजूने त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे.

महावितरणकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असल्याने चाळीसगाव, मुक्ताईनगर विभागात आज ११ मे रोजी काही उपकेंद्र व वाहिन्यांचा वीजपुरवठा चार ते दहा तास बंद राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.