कलम ३७० : मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाला पाठिंबा : खा. संजय राऊत

0

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू काश्‍मीरमधील कलम 370 हटवण्याची शिफारस केली आणि त्याला राष्ट्रपती मान्यता दिली. त्याचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे तर विरोधकांनी या निर्णयाचा निषेध व्यक्‍त केला आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा मोदी सरकारच्या या निर्णयाला पुर्णपणे पाठिंबा असल्याचे मत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्‍त केले आहे.

कलम 370 हटवले तर ते हात जळून खाक होतील अशी भाषा फुटिरतावादी नेत्यांकडून केली जात आहे. तुम्ही जाळून दाखवाच. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंमत दाखवली, आजचा दिवस स्वातंत्र्य दिनासारखाच आहे, कलम 370 हटवण्याला विरोध करणारे तेच आहेत, ज्यांनी 70 वर्ष काश्‍मीर धगधगतं ठेवलं, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा सरकारच्या निर्णयाला पाठिंबा आहे असे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी सभागृहात मांडले. तसेच आज जम्मू घेतले आहे मला पूर्ण विश्वास आहे येणाऱ्या काळात सरकार अखंड भारताचे स्वप्न नक्की पूर्ण करेल असेही राउत म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.