उप्पलखेडा येथील १५ वर्षाच्या बालकाचा विजेचा शाॅक लागुन मृत्यू

0

पाचोरा (प्रतिनिधी) :  तालुक्यातील उप्पलखेडा  येथील १५ वर्षीय बालकाचा रोहित्र जवळ खेळत असतांना अचानक विजेचे तार तुटुन त्याचे गळ्या भोवती आल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला.

दि. १९ रोजी सायंकाळी ६ वाजता रतीलाल श्रावण पवार (वय – १५) हा गावालगत असलेल्या घराजवळील रोहित्र जवळ खेळत असतांना अचानक त्याचे अंगावर विजेचे तार तुटुन पडला. व तो संपूर्ण गळ्या भोवती आवळला गेला. त्यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला. वडिलांचे छत्र हरवलेल्या रतीलाल याच्या सह एका भावंडाचा विधवा आई मोल मजुरी करुन सांभाळ करीत होती. मृत्यू नंतर त्यास शवविच्छेदनासाठी पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र घटनास्थळी विजवितरण कंपनीचे अधिकारी , कर्मचारी यांनी येवुन विचारपुस न केल्याने मृताचे नातेवाईकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत होती. गरिबांचे काहीही झाल्यास कोणीही मदतीसाठी धावुन आल्याचे व साधी विचारपूसही न केल्याने त्यांचे मनात विजवितरन कंपनी विषयी राग पहावयास मिळाला.

Leave A Reply

Your email address will not be published.