ट्रकची स्मारकाला जोरदार धडक; शहरात तणावाचे वातावरण

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शहरातील प्रवर्तन चौकात असलेल्या अर्धशहरातील प्रवर्तन चौकात असलेल्या अर्धपुतळा कृती फुले शाहू आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याला  जोरदार धडक दिली. सदर घटना काल दि. १२ डिसेंबर रोजी रात्री सव्वा दहा ते साडे दहा वाजेच्या दरम्यान घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली.  याठिकाणी मोठा जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला.  ही परिस्थिती हाताळण्यासाठी डीवायएसपी व पोलीस प्रशासन यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत गर्दी पांगली.

मध्य प्रदेश बऱ्हाणपूरकडून मुक्ताईनगरकडे एम .पी. 09 एच जी 96 66 या अनाधिकृतपणे गुर वाहून नेणाऱ्या मोठ्या ट्रकने भरधाव वेगाने येऊन काल  रात्री सव्वा दहा ते साडे दहा वाजेच्या दरम्यान मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात असलेल्या महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या  चबुतराला धडक दिली.  धडक इतकी जोरात होती की आजूबाजूच्या अर्धा किलो मीटर अंतरावर आवाज पोहोचला.  मोठ्या आवाजाने घटनास्थळी मोठा जमाव जमला.

गोवंश असलेला ट्रक भरधाव वेगाने प्रवर्तन चौकातून औरंगाबादकडे जात होता.  त्यामुळे प्रवर्तन चौकातील पुतळ्यांच्या चबूतरा तुटला.  सुदैवाने त्यात  एका दुचाकीवरुन जाणाऱ्या लहान मुलगी तिचे वडील यांनी वाहन सोडून दिल्याने बालंबाल बचावले.  धडक दिल्यानंतर त्या ट्रक चालकाने आपला जीव मुठीत घेऊन पळ काढला.  ही घटना संस्था बरोबर मुक्ताईनगर पोलीस उपविभागीय अधिकारी विवेक लावंड यांच्यासह पोलीस निरीक्षक राहुल खताळ, पोलीस उप निरीक्षक  सुदाम काकडे तसेच मोठा पोलीस फाटा या ठिकाणी बंदोबस्तासाठी हजर झाले. आणि जमावाला पांगविण्यासाठी यशस्वी झाले.

या ठिकाणी  कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण होऊ नये यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे नाशिक विभागाचे सचिव के. वाय. सुरवाडे तसेच तालुकाध्यक्ष शरद बोदडे, नगरसेवक बापू ससाने, सुधाकर बोदडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख छोटू  भोई, गोपाळ सोनवणे, पंचशील टेलर रवींद्र बोदडे, ऍड. राहुल पाटील तसेच काही सामाजिक कार्यकर्ते यांनी काळजी घेतली.

दरम्यान गोवंश असलेला ट्रक घटनास्थळावरून हलविण्यात आला.  पोलिस प्रशासनातर्फे नागरिकांना शांतता ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  त्यासोबतच बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियातर्फे आव्हान करण्यात आले आहे की महापुरुषांचे पुतळे सुरक्षित असून कोणत्याही प्रकारची तूट झालेली नाही, त्यामुळे जनतेने शांततेचे सहकार्य करावे तसेच आज सकाळी  सामूहिकबुद्ध वंदना त्रिशरण पंचशील घेण्यात येणार असून तालुक्यातील सर्व बांधवांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

डीवायएसपी विवेक लावंड तसेच पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनीसुद्धा जनतेला शांततेचे आवाहन केले आहे.  इतकेच नव्हे तर पुतळ्याच्या चबुतऱ्याचा तुटलेला भाग तात्काळ दुरुस्त करण्यात येईल असे आश्वासनही दिले.  दरम्यान त्यापूर्वी मुक्ताईनगर तालुक्यातील  बेलसवाडी येथे अनधिकृतपणे गुरांची तस्करी करणारा ट्रक पकडण्यात आला होता. या  चौकात नेहमी वर्दळ असते, परंतु सुदैवाने प्राणहानी टळली व परिस्थिती सध्या शांतता पूर्वक असून तणावाखाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.