अखेर ठरलं …उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

0

नवी दिल्ली  :- राज्य अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी दि. १६ रोजी होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केली आहे.

राज्यात सोमवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. मात्र, याआधीच मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार, हे आता निश्चित झालंय. रविवारी, १६ जून रोजी सकाळी ११ वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी राजभवनात पार पडणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीत केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चर्चा होती. त्या विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला आहे. राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, अतुल सावे, अनिल बोंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे. तर आरपीआयतर्फे अविनाश महातेकर शपथ घेणार आहेत.  मंत्रिमंडळ विस्तारानंतर शपथविधी सोहळा राजभवन येथील गार्डनवर पार पडणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.