Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    • नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»११ मे प्रशासकीय स्तरावर ” महात्मा दिन ” म्हणून साजरा करावा
    जळगाव

    ११ मे प्रशासकीय स्तरावर ” महात्मा दिन ” म्हणून साजरा करावा

    By May 10, 2020No Comments4 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लासुर ता.चोपडा (वार्ताहर) महात्मा फुले यांनी आपले विचार तळागाळातल्या समाज पर्यंत पोचविण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचे कसब, संसार, सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी, अस्पृश्यांची कैफियत, छत्रपती शिवाजी महाराज यांन वरील पवाडा इत्यादी अमोल ग्रंथनिर्मिती केली. समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक ठरले. आजही त्यांची ही ग्रंथसंपदा समाजाला दिशादर्शक व प्रेरणादायी ठरत आहे. त्या प्रमाणे त्याचे अनुलोकन करून, समस्त मानव जातीला त्यांचे आचार विचार पटऊन त्या प्रमाणे वागून, जाती भेदाचे राजकारण बाजूला ठेऊन त्यांनी संपूर्ण मानव जातीला जगण्याचा, वागण्याचा एक संदेश दिला आहे.

    फुलेंनी आपले आयुष्य समाजासाठी देत असतानाच दिनांक 11 मे 1888 रोजी महाराष्ट्रातील दुसरे समाजसुधारक रावबहाद्दूर विठ्ठलराव कृष्णाजी वडेकर यांच्या हस्ते मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेने लाखोंच्या उपस्तीत फुले यांना महात्मा ही पदवी बहाल केली. त्या वेळे पासून देश त्यांना महात्मा ज्योतिराव फुले म्हणून ओळखू लागली आहे. सन 2016 पासून श्री संत सावता माळी युवक संघ 11 मे हा “महात्मा दिन” म्हणून मोठया उत्साहाने लोकाभिमुख / जनहितार्थ उपक्रम तसेच त्यांचे कार्य, त्यांचे विचार लोकां पर्यंत पोहचऊन साजरा करत आहे. मागच्या वर्षी 18 जिल्ह्यमध्ये 11 मे – महात्मा दिन म्हणून साजरा केला, शासन दरबारी सुद्धा हा दिवस 11 मे – महात्मा दिन म्हणून साजरा करावा ह्या साठी निवेदन देऊन आम्ही सर्व जन प्रयत्न करत आहे.

    तरी हा दिवस राज्य सरकारने सुद्धा प्रशासकीय स्तरावर “महात्मा दिन” म्हणून साजरा करावा यासाठी चोपडा तहसिलदार यांना या आशयाचे मागणी चे निवेदन श्री संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य खान्देश विभागीय अध्यक्ष जितेंद्र महाजन, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संध्याताई महाजन, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण माळी, जिल्हा संपर्क प्रमुख महेंद्र माळी, शहर अध्यक्ष दशरथ महाजन, तालुकाध्यक्ष राजू भाऊसाहेब, तालुका उपाध्यक अल्केश महाजन, तालुका संपर्क प्रमुख समाधान माळी, शहर सचिव विठ्ठल माळी आदी पदाधिकारी यांनी दिले

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!

    May 18, 2026

    पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!

    May 18, 2026

    रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात

    May 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif