पाचोरा (प्रतिनिधी) : संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृधापकाळ योजना, इंदिरा गांधी विधवा योजना, इंदिरा गांधी अपंग योजना, व इंदिरा गांधी वृधापकाळ योजना या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातिचे दाखले सादर करावे लागत असल्याने वृधांनी पाचोरा तहसिल कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात मोठ्या रांगा लागल्या असून अनेकांनी एकाच वेळी गर्दी केल्यांने वृध महिला व पुरुषांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. नोव्हेंबर ते जानेवारी अखेरपर्यंत दाखले सादर करण्याची मुदत असतांना वृधांनी एकच गर्दी केल्याने मोठ्या रांगा लागल्या आहेत.
पाचोरा तालुक्यात श्रावणबाळ वृधापकाळ योजना (६८१७), संजय गांधी निराधार योजना (५६००), इंदिरा गांधी निराधार योजना (४९६९), इंदिरा गांधी विधवा योजना (४६६) व इंदिरा गांधी अपंग योजना (२६) असे एकुण १७ हजार ८७८ लाभार्थी आहेत. या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी लाभार्थ्यांना वर्षातून एकदा नोव्हेंबर ते जानेवारी अखेरपर्यंत हयातीचा दाखल कार्यालयात सादर करावा लागतो. दाखले सादर करतांना ग्रामिण भागात सरपंच अथवा पोलिस पाटील, तर शहरी भागात रहिवासी असलेल्या प्रभागातील नगरसेवकांचा स्वत:चा पासपोर्ट लावून हयातीचा दाखल घेणे आवश्यक असून दाखल्या सोबत आधार कार्ड ची झेरॉक्स, बॅंकेच्या पासबुकाची झेरॉक्स व खात्री करण्यासाठी पास बुकाची मुळ प्रत सोबत आणने आवश्यक आहे या पूर्वी लागार्थींचे खाते संबंधित गावाच्या पोष्ट कार्यालय व गावाजवळील जिल्हा मध्यवर्ती बँकेत होते. मात्र आता ते राष्ट्रिय कृत बॅंकेत उघडण्यात आल्याने लाभार्थ्यांचे खाते आधारशी लिंक करुन थेट खातेदाराचे नावावर पैसे ट्रान्स्फर करण्यासाठीची ही योजना आहे. यात विविध योजनांचे अनुदान ६०० रुपयांहून १ हजार रुपये तर इंदिरा गांधी विधवा योजनाचे ७०० हून एक अपत्य असलेल्या लाभार्थी साठी १ हजार १०० रुपये व दोन अपत्यासाठी १ हजार २०० रुपये अनुदान मिळणार असल्याने या लाभार्थ्यांनी आपत्यांचे दाखले जोडावे असे आवाहन तहसिलदार कैलास चावडे यांनी केले आहे. योजनेचे दाखले संगायोचे नायब तहसिलदार मुकेश हिवाळे, भाऊसाहेब नेटके, रेखा साळुंखे, सिमा पाटील हेमंत जडे यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.