हतनूर परिसरात चातक पक्षाचे आगमन 

0
वरणगाव ;-  येथील हतनूर धरणावर आफ्रिकेतून चातक पक्षाचे आगमन झाल्याने नैऋत मौसमी वाऱ्याची चाहूल लागल्याने पावसाचे आगमन लवकरच होणार असल्याचे चातक निर्सग संवर्धन संस्थेचे अनिल महाजन यांनी सांगीतले.
  चातक पक्षी हा अफ्रीकेतून भारताकडे हजारो किलोमिटरचे अंतर कापून भारतात दाखल होतो . या शुभ पक्षाचे दर्शन झाल्यास पावसाचे आगमन होते . त्यानुसार शेतकरी पेरणीच्या कामाला लागतो .  हतनूर धारण परिसरात चातक पक्षच आगमन झाल्याने   पक्षी अभ्यासक उदय चौधरी विठ्ठल बरगडे विलास महाजन ,दादा जावळे लक्ष्मीकांत नेवे, सामिर नेवे, राजपालसिंह राजपूत, सत्यपाल सिंह राजपूत  उपस्थित होते .
Leave A Reply

Your email address will not be published.