जळगाव;- स्व. भय्यूजी महाराज त्यांच्या समर्पित आणि रचनात्मक सामाजिक कार्यामुळे खऱ्या अर्थाने युगपुरुष होते असे गौरवोद्गार हभप जळकेकर महाराज यांनी आयएमआय हॉल येथे आयोजित केलेल्या सर्वपक्षीय शोकसभेच्या समारोपप्रसंगी केले .
यावेळी आ. स्मिता वाघ,आ. राजूमामा भोळे, प्राचार्य डॉ. अजित वाघ,प्रतिभा सुर्वे,डॉ. सुरेश सूर्यवंशी,किरण साळुंखे , संभाजीराव देशमुख,अशोकराव शिंदे,पत्रकार राजेश यावलकर,निलेश झोपे,प्रा. राजेंद्र देशमुख,प्रा. सुनील गरुड , भास्करराव चव्हाण,डॉ. राहुल मयूर,चंद्रशेखर अहिरराव आदींनी यावेळी भय्यूजी महाराज यांच्या आठवणींना उजाळा दिला . सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र देशमुख यांनी तसेच रेडक्रॉस सोसायटी,जिल्हा पत्रकार संघ,आदी संस्थांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी ऍड . विजय पाटील , विनोद देशमुख,जितेंद्र देशमुख,जयप्रकाश महाडिक,जवाहर देशमुख,शंकरराव तिडके,धीरज जावळे,दत्तात्रय पवार,गोविंद लाठी,प्रा. संजय सुर्वे,एस.एन. देशमुख आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी विजय शिंदे यांच्या शांतीमंत्राने शोकसभेची सांगता झाली.