सोशल मीडियावर मरणाचे अंत्यविधीचे, अमरधामचे व्हिडीओ प्रसारित होत आहे त्यावर प्रतिबंध यायला हवे ; मिलींद सोनवणे

0

लासुर (प्रतिनिधी) — तालुक्यात कोरोनाचे रूग्ण रोजच वाढत आहे मागील सहा दिवसापासून हॅट्रिकच सुरू आहे अजूनही तालुक्यातील आकडेवारी कमी होतांना दिसून येत नाही शहारातील प्रत्येक जवळपास प्रत्येक घरात किव्हा परिसरात कोरोनाचा रुग्ण आहे आणि कोरोना रुग्णांना औषधी पेक्षाही मोरलं सपोर्टची (हिम्मतीची) जास्त आवश्यकता आहे परंतु अश्यात जो -ना- तो उठसूठ अमरधामातील अंत्यविधीचे व्हिडीओ फोटो टाकत असल्याने जे रुग्ण घरी काॅरोन्टाईन आहेत ते रुग्ण व्हिडीओ पाहून – पाहून खच्चीकरण होत आहे.

आणि घाबरत असल्याने अनेक रुग्ण चांगले होण्या ऐवजी आपली स्वतःची जास्त प्रकृती बिघडवुन घेत आहे आणि परिणामी रुग्ण दगावत आहे त्यामुळे समाजातील सर्व स्थरातील लोकांना विनंती आहे की सोशल मीडियावर असा कोणताही व्हिडीओ आपण टाकु नये याबाबत तहसीलदार, पोलीस निरीक्षकाना लेखी व्हाट्सएपच्या माध्यमातून येथील पत्रकार मिलींद सोनवणे यांनी निवेदन दिले आहे आणि अश्या व्हिडीओ प्रसारित करणाऱ्यावर कारवाई करावी असे ही या निवेदनात म्हटले आहे.

अश्या बातम्या अश्या व्हिडीओ वर शासनाच्या वतीने बंदी आणावी, आणि अश्या विचित्र मनस्थिती च्या लोकांवर ही कार्रवाई केली पाहिजे.अशी आपणास विनंती करतो.कारण महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचा भस्मासुर हा जळगाव जिल्ह्यात आहे,आणि त्यातल्या त्यात चोपडा तालुक्यात आहे.म्हणून अश्या लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या वाइट प्रवृतीच्या लोकांचा बंदोबस्त करावा अशी विनंती आणि शासनाच्या वतीने जनजागृती करण्यासाठी काही पथक ही नेमावे असेही मिलिंद सोनवणे यांनी बोलताना सांगितले

Leave A Reply

Your email address will not be published.