तरुणाईने समाजाला आपल्या परीने समृद्ध करावे – नीला सत्यनारायण

0

दिव्यांगांचा प्रेरणादायी दीपस्तंभ यशोत्सव संपन्न ‘ यूपीएससी, एमपीएससी यशवंतांचे मार्गदर्शन

जळगाव – समाजाला आपापल्या परीने योगदान देऊन समाज समृद्ध करा असा सल्ला जेष्ठ निवृत्त सनदी अधिकारी, माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी नवोदित अधिकारी व उपस्थित तरुणाईला दिला.

दीपस्तंभ फाउंडेशन आयोजित यूपीएससी, एमपीएससी परीक्षेतील यशवंत व मनोबल प्रकल्पातील दिव्यांग प्रज्ञाचक्षु यशवंतांच्या सत्काराच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी मंचावर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ के बी पाटील, यूपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम आलेले आयएएस भुवणेश पाटील, आयआरएस मयूर सुर्यवंशी,माजी शिक्षणाधिकारी निळकंठ गायकवाड, आर्यन इको टुरिझम च्या संचालिका रेखा महाजन,वित्त व लेखाधिकारी कपिल पवार उपस्थित होते.


पुढे बोलताना श्रीमती नीला सत्यनारायण म्हणाल्या की, देशाला अनेक मनोबल प्रकल्पांची गरज आहे ,दिव्यांगाचा न्यूनगंड नष्ट होतो,मला सुद्धा शालेय शिक्षण घेत असताना न्यूनगंड होता.माझे वडील पोलीस खात्यात असल्यामुळे नेहमी बदली होत असे. प्रत्त्येक वेळी नवीन शाळेत मी शिकायला गेली की वडील विचारत तू आता काय करशील तर मी प्रत्येक शाळेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. आयएएस ची परीक्षा मी ऐंशी च्या दशकात उत्तीर्ण झाली. तेव्हा मला खूप लोकांनी नाउमेद केले परंतु मी पहिल्या प्रयत्नात आयएएस झाले. स्वतःवर विश्वास ठेवला तर सार काही शक्य आहे. प्रशासकीय अधिकारी होण्यापेक्षा चारीरत्र्यवान अधिकारी होणं अवघड आहे. आताच्या पिढीत उत्साह आहे आता नवीन अधिकारी पहिले काही वर्ष जोमाने काम करतात नंतर एखादया मंत्र्यांच्या चमुत जातात व निष्क्रिय होतात. अधिकारी कोणत्याही पक्षाचा, धर्माचा अथवा जातीचा नसतो तो फक्त देशाचा असतो हे लक्षात ठेवले पाहिजे. निसर्गाने प्रत्येकाला एक देणगी दिलेली असते ती शोधून काढा जगणं अजून सुंदर होईल.स्पर्धा परीक्षेत कोणते पद मिळाले या पेक्षा जे पद मिळाले त्या खुर्चीचा सन्मान वाढवा.अधिकारी झाल्यावर आई वडिलांना अंतर देऊ नका असेही त्या म्हणाल्या.

याप्रसंगी यूपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण भुवणेश पाटील,तसेच यूपीएससी यशवंत मयूर सुर्यवंशी स्वप्नील पवार, स्वप्नील सुर्यवंशी, आकाश कोळी यांचा आईवडिलांसह सन्मान करण्यात आला.याप्रसंगी बोलताना भुवनेश पाटील म्हणाला की,मी शाळेत असताना वडिलांनी मला ताई मी कलेक्टर व्हयनु हे राजेश पाटील यांचे पुस्तक वाचायला दिले तेव्हा मी सुद्धा प्रेरणा घेऊन आयएएस होण्याचे स्वप्न पाहिले.जीवनात आई व वडील यांनी खंबीर साथ दिली. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण व नियोजनबद्ध अभ्यास आवश्यक आहे. मयूर सूर्यवंशी यांनीही मार्गदर्शन केले.
एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन उपजिल्हाधिकारी पॅड मिळवलेले रोहितकुमार राजपूत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, स्वतःला ओळखा स्पर्धा परीक्षा देताना आधी अभ्यासक्रम समजून घ्या त्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून अभ्यास करा. यशाचा टप्पा खुप सुंदर असतो. शिक्षण खूप आवश्यक आहे.लग्नसमारंभातील अनावश्यक खर्च टाळून मुलांना उच्च शिक्षित केले पाहिजे.

याप्रसंगी सहाय्यक राज्यकर आयुक्त वंदना चौधरी, विक्रीकर निरीक्षक मानसी पाटील, सागर चौधरी, पोलीस उपनिरीक्षक माया राजपूत यांनी मनोगत व्यक्त केले.

मनोबल प्रकल्पातील दिव्यांगांचे यश पाहून उपस्थितांना गहिवरून आले, या प्रकल्पातील आदिवासी पाड्यावरील मालसिंग वसावे या सेरेब्रल पालसी विकार ग्रस्त तरुणाने एमपीएससी परीक्षेत यश मिळवले. तर एक हात व एक पाय नसणाऱ्या रीना बारेला ही युवती एमपीएससी क्लर्क झाली आहे.चौधरी लॉ पबिशर्स तर्फे मनोबल केंद्राला अकरा हजार रुपयांची देणगी दिली.
या प्रसंगी बोलताना मालसिंग वसावे म्हणाला की,अतिशय हलाखीची परिस्थिती असताना मनोबल केंद्रामुळे आमच्या जीवनात आनंदाचे क्षण आले.मला सर्व समाज टिंगल करायचा, मित्र नाव ठेवायचेत माझं अपंगत्व मला असह्य होतं परंतु मनोबल खऱ्या अर्थाने आत्मविश्वास दिला. माजी कुलगुरू डॉ के बी पाटील यानी अध्यक्षीय मनोगत माडले

यांचा झाला सत्कार : यूपीएससी यशवंत
भुवनेश पाटील (आयएएस ) धुळे
मयूर सूर्यवंशी (आयआरएस) धुळे,स्वप्नील पवार ,स्वप्निल सुर्यवंशी
एमपीएससी यशवंत :
रोहितकुमार राजपूत (उपजिल्हाधिकारी)
वंदना चौधरी( सहायक राज्यकर आयुक्त)
आसिर शेख ( सहायक राज्यकर आयुक्त)
समाधान सोनवणे (तहसीलदार)
जीवन मोराणकर ( उपशिक्षणाधिकारी)
विक्रीकर निरीक्षक यशवंत :
मानसी पाटील , सागर चौधरी, सतीश धनगर
सहाय्यक कक्ष अधिकारी: अभिषेक वासू
एनडीए : अथर्व अनिल भोकरे
पोलिस उपनिरीक्षक :
तुषार सुधाकर पाटील(धुळे), माया नारायण राजपूत(कळमसरा ता शिरपूर)
विजया रामसिंग वसावे( कोलदा जि नंदुरबार)
मयूर सुरेश पवार बुलढाणा
कैलास केशव माळी( समोडे जि धुळे)
विजय राजेंद्र कोळी ( वराट ता चोपडा)
मिताली सोनवणे जळगाव
प्रेमकुमार दांडेकर ( श्रीगोंदा)
सुहासिनी छगन बारेला ( चोपडा)
मुकेश बापू शिरसाठ(जळगाव)
पराग दिवाकर भिवापुरे(कोरपना जि चंद्रपूर)
शुभांगी श्रीरंग मोरे ( सातारा)
अमरसिंग देवसिंग पाटील(गुप्तवार्ता विभाग )

करसहाय्यक:
अनुजा अंबड, पूनम डुकरे ,निलेश भोई, सुजाता कोळेकर,करूना बेलसरे,जयेश देवरे,किशोर निकम

बँकिंग अधिकारी:
संदीप ठाकरे

मनोबल प्रकल्पातील यशवंत:
रीना बारेला ( मंत्रालय लिपिक)
मालसिंग वसावे ( मंत्रालय लिपिक)
सुजाता कोळेकर (करसाहाय्यक)
विद्या पाटील (बँक)
अभिजित बांगर( पोस्ट खाते लिपिक)
भगवान भोई (मंत्रालय लिपिक)
प्रवेश सिडाम ( मंत्रालय लिपिक)
तुकाराम बांगर ( पोस्टल asst. )
संध्या कुकडे ( MSRTC )
या प्रसंगी दीपक बाविस्कर व दिलीप पाटील लिखित महाराष्ट्राचा भूगोल , जगाचा भूगोल तसेच जयदीप पाटील लिखित संपूर्ण विज्ञान या पुस्तकाच्या सहाव्या आवृत्तीचे प्रकाशन नीला सत्यनारायण यांच्या हस्ते करण्यात आले
कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजेंद्र चव्हाण ,जयदीप पाटील यांनी केले प्रास्ताविक यजुर्वेन्द्र महाजन यांनी केले आभार महेंद्र पाटील यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.