हे बोल आहेत महसूलमंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे. चंद्रकांत पाटील शनिवारी जळगाव जिल्हा दौर्यावर असतांना जळगाव तालुक्यातील काही सरपंचानी चंद्रकांत पाटलांची भेट घेतली. माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांना मुख्यमंत्री करा अशा मागणीचे निवेदन सरपंचानी पाटलांना दिले. सरपंचांच्या शिष्टमंडळाला चंद्रकात पाटलांनी वरील बोल सुनावले. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की, एकनाथराव खडसे यांना आताच मुख्यमंत्रीपद मिळू शकणार नाही असेच चंद्रकांत पाटलांनी सूचित करून टाकले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खडसेसंदर्भात जी जी वक्तव्य केले. त्यातून बरेच काही अर्थ ध्वनित होताय. पत्रकारांनी एकनाथराव खडसे संदर्भात विचारले असता खडसे हे मोठे नेते आहेत. त्यांचेसंदर्भात मी काय बोलणार? या त्यांच्या बोलण्यातून चंद्रकांत पाटलांनी खडसे यांना उपरोधिक टोला तर दिला नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतो. त्याचप्रमाणे खडसेंना बदनाम करणारा तो मंत्री कोण? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला तर त्यावर चंद्रकांत पाटील म्हणतात माध्यमांकडे जाणे- ही भाजपची संस्कृती नाही असाही टोला मारला. एकनाथराव खडसे वारंवार माध्यमांकडे जातात म्हणून चंद्रकांत पाटलांना हे सूचित करावयाचे होते का? तसेच खडसेंना त्रास देणार्या मंत्र्याचे नाव खडसेंनी मुख्यमंत्र्यांकडे द्यावे असा सल्लाही चंद्रकांत पाटलांनी दिला. यावरून दोन वर्षापूर्वी बोलणार्या चंद्रकांत पाटलांची भाषा आता बदललेली दिसते भोसरी एमआयडीसी प्रकरणी दोन वर्षापूर्वी एकनाथराव खडसेंनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर महसूल खाते चंद्रकांत पाटलाकडे सुपूर्द करण्यात आले तेव्हा मी राम भक्त आहे माझ्याकडे रामाच्या पादुका आलेल्या आहेत. त्या काही दिवसानंतर पादुका परत दिल्या जातील. कायमस्वरुपी हे खाते माझ्याकडे राहणार नाही. दोन वर्षापूर्वी खडसेंच्या संदर्भात बोलणार्या चंद्रकांत पाटलांची भाषा आता बदललेली दिसून येते. दोन वर्षानंतर आता चंद्रकांत पाटील जे बोलत आहे. ते उपरोधिकपणे बोलत असल्याचा वास येतो. त्यामुळे समयसे पहिले, किस्मतसे जादा कुछ नही मिलता हे त्यांचे वक्तव्य वादग्रस्त ठरणारे आहे. कारण खडसे हे लोकनेते आहेत. पक्षांसाठी त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात भाजप वाढविण्यासाठी खड्सेंची मेहनत आणि त्यांच्या परिश्रमाकडे कानाडोळा करून चालणार नाही. त्याचबरोबर एकनाथराव खडसेंवर झालेल्या आरोपातून त्यांना क्लीनचीट मिळाली आहे. त्यामुळे भाजपातील ते वरिष्ठ व अनुभवी नेते आहेत. हे विसरून चालणार नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटलांचे हे बोल खडसेंना तसेच त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना कितपत पचनी पडेल याची सांशकता आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शनिवारी धावता जळगाव जिल्हा दौरा झाला. जळगाव जिल्ह्यात वादळी संकटाने केळी बागांचे फार मोठे नुकसान झाले आहे. या घटनेस 10-12 दिवस उलटले तरी केळीच्या नुकसानी संदर्भात अद्याप ठोस पावले उचलले गेले नाही. आता पंचनामे पूर्ण झाले आहेत असे सांगण्यात येते तरी सुद्धा पालकमंत्री जळगावात आल्यानंतर त्यांनी केळी बागांच्या नुकसानीची पाहणी करून केळी उत्पादकांशी संवाद साधला पाहिजे होता. शेतकर्यांना हे अपेक्षित होते तथापि चंद्रकांत पाटलांनी त्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे जळगाव जिल्हयातील नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकरी नाराज आहेत. केळी उत्पादकांना निश्चित आर्थिक मदत मिळेल असे सांगून शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचाच जणू प्रयत्न केला. जळगाव जिल्हयातील जामनेर तालुक्यात वाकडी येथे विहिरीवर पोहण्यासाठी गेलेल्या मातंग समाजातील दोन अल्पवयीन मुलांना नग्न करून अमानुष मारहाण केली. या घटनेचे देशभरात पडसाद उमटले. देशभरातील सर्व पक्षांचे नेते मंडळी वाकडी येथे पिडीत मुलांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी रीघ लागली. तथापि पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे जळगावात असतांनासुद्धा वाकडीला जाणे टाळले. काँग्रेस या घटनेला राजकीय रंग देतेय असे वक्तव्य करून वाकडीकडे पाठ फिरवून शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारांचा निवडणूक प्रचार करून धुळेकडे प्रचारासाठी रवाना झाले. जळगाव जिल्हयातील दोन्ही महत्वाच्या घटनासंदर्भात पालकमंत्र्यांनी केलेला कानाडोळा या प्रकाराने सर्वत्र असंतोष पसरला आहे.
जळगाव महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या दोन अडीच महिन्यावर आली आहे. महापालिकेत समविचारी पक्षाशी युती करण्यात येईल असे संकेत पालकमंत्री चंदकांत पाटील यांनी दिले. तसेच युती जरी झाली तरी महापौर भाजपचाच असेही सांगून टाकले त्याचबरोबर महापालिका निवडणुकीची अजून तयारी व्हायची असल्याचे सांगून एकनाथराव खडसे, गिरीश महाजनन आणि आ.राजूमामा भोळे यांची कोअर कमेटी त्याबाबत निर्णय घेईल असे चंद्रकांत पाटलांनी सांगितले परंतु एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांचे कोअर कमेटीत कितपत जमेल हे सांगता येणार नाही. कारण दोघांत विळ्या भोपळ्याचे नाते असल्याचे स्पष्ट जाणवते. वादळात नुकसान झालेल्या केळी बागांची पाहणी एकाच दिवशी महाजन आणि खडसे यांनी केली असली तरी दोघांची तोंडे दोन दिशेला होती. तसेच यापूर्वी खडसे यांनी मनपा निवडणुकीत सहभाग घेणार नाही.असे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील म्हणत असले तरी या तिघांच्या कोअर कमेटीविषयी शंकाच वाटते. महापालिकेची निवडणूक कुणाच्या मेतृत्वात लढवायची हे मुख्यमंत्रीच ठरवतील असे सांगून त्या प्रश्नाला मात्र चंद्रकांत पाटलांनी बगल दिली आहे. महापालिका निवडणुकीत नेतृत्व कोणाकडे राहील हा वाद्सुद्धा चांगलाच रंगण्याची चिन्हे आहेत.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Next Post