नवी दिल्ली: शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत भाजपला तातडीने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी केली होती. दरम्यान, यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सत्तास्थापनेसंदर्भात राज्यापालांनी ज्या कागदपत्रांच्या आधारे निर्णय घेतला. ती कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली. त्यावर दोन्ही बाजूंनी युक्तीवाद झाला. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं निर्णय राखून ठेवला असून, यावर उद्या (२६ नोव्हेंबर) सकाळी १०.३० वाजता अंतिम निर्णय देणार आहे .
NCP-Congress-Shiv Sena petition: Supreme Court reserves order for tomorrow 10.30 am. https://t.co/PyKO0WzEJ4
— ANI (@ANI) November 25, 2019
शनिवारी २३ रोजी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला समर्थन दिल्याने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. सोबतच अजित पवारांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात भूकंप झाला. अजित पवारांचा हा निर्णय पक्षविरोधी असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना समर्थन नसल्याचे सांगितले. या प्रकरणावरून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत भाजपला तातडीने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी केली होती. दरम्यान काल आणि आज सोमवारी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने निकाल राखीव ठेवला असून उद्या सकाळी १०.३० वाजता याबाबत निकाल देणार आहे. त्यामुळे आज देखील भाजपला दिलासा मिळाला आहे.