जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा दावा ; येत्या दोन दिवसात खाविआसोबत युतीबाबत चर्चा करणार
* गिरीश महाजन उवाच ….
* भाजपचाच महापौर होणार
* वर्षभरात १०० ते १५० कोटींचा निधी होईल खर्च
* १५ वर्षांत शहराची अवस्था वाईट
* सक्षम उमेदवारांमधून जागावाटपाचा आकडा होईल निश्चित
* सतीश अण्णांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीची अवस्था बघावी
——युतीसाठी उद्धव ठाकरेंची संमती – सुरेशदादा जैन ———
भाजप सेना युतीसाठी अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी देखिल संमती दिली आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाचे चिन्ह वापरले तरी हरकत नसल्याची भूमिका उध्दव ठाकरे यांनी घेतल्याचे माजी आमदार सुरेश जैन यांनी सांगीतले. जागावाटपाबाबत ना. महाजन यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचेही ते म्हणाले. महापौरपद दोघा पक्षांनी सव्वा सव्वा वर्ष घ्यावे असा प्रस्ताव ठेवणार असल्याचेही ते म्हणाले.
भाजप सेना युतीसाठी अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी देखिल संमती दिली आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाचे चिन्ह वापरले तरी हरकत नसल्याची भूमिका उध्दव ठाकरे यांनी घेतल्याचे माजी आमदार सुरेश जैन यांनी सांगीतले. जागावाटपाबाबत ना. महाजन यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचेही ते म्हणाले. महापौरपद दोघा पक्षांनी सव्वा सव्वा वर्ष घ्यावे असा प्रस्ताव ठेवणार असल्याचेही ते म्हणाले.
जळगाव ;- गेल्या १५ वर्षात जळगाव शहराची अवस्था वाईट झाली असून येणाऱ्या वर्षभरात सत्ता आल्यास जळगावचा चेहरा मोहरा बदलवून टाकेल असा दावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केला . यावेळी ना. महाजन यांनी येत्या दोन दिवसात माजीमंत्री सुरेशदादा जैन यांच्यासोबत युतीसंदर्भात चर्चा करणार असून मात्र भाजपचाच पाच वर्ष पूर्णवेळ असणारा महापौर होणार असा आशावाद त्यांनी व्यक्त केला . दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार डॉ. सतीश पाटील यांच्यावर महाजन यांनी कडाडून टीका केली . त्यांनी आधी आपल्या पक्षाचे दोन-चार उमेदवार निवडून येण्याचे पाहावे अन्यथा झिरो राहतील असा टोला त्यांनी यावेळी हाणला. यावेळी आमदार तथा भाजप शहर महानगराध्यक्ष राजूमामा भोळे उपस्थित होते .
भाजपातर्फे ईच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे सुरु आहे . मुबईतून आज जळगावात आलेल्या जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन यांनी आज कार्यकर्त्यांशी संवाद साधून निवडणुकीबाबत चारचा करण्यासाठी ते भाजप कार्यालयात आले असता पत्रकारांशी संवाद साधला . यावेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले कि , निश्चितच भाजपाची सत्ता हि जळगाव मनपात येणार आहे . याबाबत चर्चा करण्यासाठी माजी मंत्री सुरेशदादा जैन हे काल मुंबईत मुख्यमंत्र्याना भेटण्यासाठी आले होते . यावेळी योगागयोगाने चंदुलाल पटेलही उपस्थित होते . मात्र युती संदर्भात अधिक चर्चा होऊ शकली नाही .
जळगावकरांना भाजपकडून अपेक्षा
भाजपाकडून इच्छुकांचे अर्ज स्वीकारणे सुरु आहे . जागा वाटपात जास्तीत जास्त सक्षम उमेदवार ठरवले जाणार आहेत . त्यावरून भाजपा कडून जागा वाटप निश्चित केले जाईल . माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्याबाबत येत्या दोन दिवसात पक्ष प्रवेशाबाबत निर्णय होईल . तसेच भाजपात अनेक पक्षांचे आजी माजी नगरसेवक येतील . यात राष्ट्रवादी भाजपच्या पराभूत झालेल्यांची संख्या जास्त आहे .
भाजपचा महापौर राहण्यासाठी आग्रही
भाजपाचा महापौर असावा हि मागणी असून येणाऱ्या वर्षभरात साता आली तर जळगावचा चेहरा मोहरा बदलवणार असल्याचे महाजन यांनी सांगितले . जळगावकरांच्या आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत . इतर महापालिकांपेक्षा जळगाव शहराची अवस्था वाईट असून मुख्यमंत्र्यानी १०० किंवा १५० कोटी वर्षभरात देण्याचे सांगितले आहे . हा निधी जळगावच्या विकासकामांसाठी खर्च करणार असल्याचे ना. महाजन यांनी सांगितले . २०० ते ५०० कोटींचा निधी इतर महापालिकांना मिळतो . मात्र जळगाव महापालिकेला असा निधी मिळाला नाही. १५० कोटी खर्च करून या निधीच्या खर्चाद्वारे जळगावचा चेहरा मोहरा बदलून जाईल असेही महाजन यांनी सांगितले .
कायापालट करून दाखवू
१५ वर्षांच्या काळात जळगावची अवस्था वाईट झाली आहे . महापालिकेवर कर्जाचा डोंगर आहे . या चक्रव्युव्हातून बाहेर काढायचे असेल तर आम्हला जळगावकरांनी संधी द्यावी त्यांना कायापालट करून दाखवू असा दावाही गिरीश महाजन यांनी केला .
अण्णा जिल्ह्यातील अवस्था आधी पाहा
राष्ट्रवादीचे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी गिरीश महाजनांनी सुरेशदादांपुढे लोटांगण घातले व आमदार भोळेंना डावलून युतीचा निर्णय घेतल्याची टीका गुरुवारी केली होती . असा प्रश्न उपस्थित केला असता उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले कि , सतीश अण्णांनी दोनचार उमेदवार निवडून आणल्याचे पाहावे. तुम्ही आधी जिल्ह्यातील अवस्था बघावी मगच टीका करावी . त्यांच्या पक्षातील अनेक मोठे नेते जामनेरात प्रचाराला आले मात्र अवस्था झिरो झाली . याची अण्णांनी चिंता करावी असा टोला गिरीश महाजन यांनी यावेळी हाणला.
कुणीतरी आग लावण्याचे काम केले
गुरुवारी सोशल मीडियावर आमदार राजूमामा भोळे यांना डावलून युतीचा निर्णय घेण्यात आला होता असा मेसेज व्हायरल झाला होता . यावर बोलताना गिरीश महाजन यांनी राजूमामा भोळे हे पक्षाचे जिल्हा महानगराध्यक्ष आणि आमदार आहेत . त्यांना डावलून निर्णय कसा होणार ? तसे बघितल्यास याबाबत फायनल बोलणी झाली नव्हती . मात्र कुणीतरी आग लावली असून भाजपात सर्वानुमते निर्णय घेण्यात येतो अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी व्यक्त केली .
रिपाइंची ८ जागा सोडण्याची मागणी
मनपा निवडणुकीत रिपाइंला भाजपाने ८ जागा सोडाव्यात अशी मागणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन यांच्याकडे केली . आज दिवसभरात २८ इच्छुक उमेदवारांनी अर्ज केले . त्यात रिपाइं कार्यकर्त्यांची संख्या जास्त होती अशी माहिती सूत्रांनी दिली .