Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चाळीसगावात ‘शरीरशुद्धि प्राकृतिक चिकित्सा शिबिर’
    • कृउबा सभापतीपदी लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»सत्ताधाऱ्यांच्या खोट्या आश्वासनांना जनता आता बळी पडणार नाही -शरद पवार
    जळगाव

    सत्ताधाऱ्यांच्या खोट्या आश्वासनांना जनता आता बळी पडणार नाही -शरद पवार

    By October 14, 2019No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शेंदुर्णी – केंद्रात व राज्यात भाजपा मित्र पक्षाचे सरकार आहे.जनतेच्या मुलभुत समस्या सोडविण्यात हे सरकार सर्वच स्थरावर अपयशी ठरले आहे. भावनिक मुद्दे मांडुन यांनी बेरोजगारी वाढविली.सहकार, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्राचे खच्चीकरण केले.शिवाजी महाराजांचे स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाची नुसतीच घोषणा केली.सत्तेचा दुरुपयोग करुन विरोधी पक्षातील नेत्यांना, कार्यकत्यांना ई.डी.तसेच अनेक प्रकारचा त्रास देत आहे.मुख्यमंत्री म्हणतात समोर लढायला पहेलवान नाही मग पंतप्रधान व गृहमंत्री का महाराष्ट्रात सभा घेत फिरत आहे .आता महाराष्ट्रातील जनता यांना त्यांची जागा दाखविणार असुन जामनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी व मित्र पक्षाचे उमेदवार संजय गरुड यांनाच निवडुन देईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी शेंदुर्णीत व्यक्त केला.

    राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय गरुड यांच्या प्रचारासाठी शरदचंद्र पवार शेंदुर्णीत झालेल्या प्रचंड जाहीर सभेत बोलत होते.

    यावेळी राष्ट्रवादी चे उमेदवार संजय गरुड यांनी आपल्या भाषणात राज्य सरकारवर व राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री व भाजपाचे विधानसभेचे उमेदवार गिरीश महाजन यांच्या २५ वर्षाच्या  अकार्यक्षमतेचा पाढा वाचला.भाऊंनी तालुक्याला विकासापासुन वंचित ठेवल्याची टिकास्र सोडले.जनतेला यंदा परिवर्तन होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

    यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, कवीवर्य ना.धों.महानोर, गफ्फार मलिक, अँड. रविंद्र पाटील, अँड. संदिप पाटील, रंगनाथ काळे,विलास पाटील, शिरिष चौधरी, अरुण पाटील, जगन सोनवणे,सौ.सरोजनी गरुड,सौ.वंदना चौधरी,डॉ. ऐश्वर्या राठोड, पारस ललवाणी, सुरेश धारीवाल,प्रदिप लोढा,कैलास पाटील, अँड. ज्ञानेश्वर बोरसे,डी.के.पाटील, प्रफुल्ल लोढा,सागरमल जैन, शंकर राजपुत,दगडु पाटील, शांताराम गुजर व जिल्ह्यातील मित्र पक्षांचे मान्यवर नेते, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संंख्येने हजर होते.

    यावेळी भाजपा ,शिवसेनतुन राष्ट्रवादी पक्षात अनेकांनी प्रवेश केला त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    चाळीसगावात ‘शरीरशुद्धि प्राकृतिक चिकित्सा शिबिर’

    May 18, 2026

    कृउबा सभापतीपदी लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड

    May 18, 2026

    विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!

    May 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif