जामनेर :- पाचोरा जामनेर रेल्वे मार्ग बोदवडपर्यत करण्यासाठी आपण प्रयत्नशिल असून जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गिरीश महाजन यांच्यावर संपूर्ण राज्याची जबाबदारी असल्याने तालुक्यात देखील त्यांना जास्त वेळ देता येत नाही,त्यासाठी कार्यकर्त्यांनी देखील आपल्यावर असलेली जबाबदारी पार पाळावी.केंद्र शासन व राज्य सरकार यांच्या सर्व योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवा असे प्रतिपादन रावेर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार रक्षा खडसे यांनी शहरातील बाबाजी राघो मंगल कार्यालयात आयोजीत पक्षाच्या तालुका विस्तृत बैठकीत केले.

यावेळी व्यासपीठावर लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना महाजन,जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे,जिल्हाउपाध्यक्ष गोविंद अग्रवाल,डॉ.मिलिंद वायकडे,तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर,जितू पाटील,अॅड.शिवाजी सोनार,छगन झाल्टे,न.प.गटनेते डॉ.प्रशांत भोंडे, उपनगराध्यक्ष अनिस शेख,जिल्हा परिषदेच्या सदस्या विद्या खोडपे,सुनीता पाटील,पंचायत समितीच्या सभापती निता पाटील,नगरसेवक बाबुराव हिवराळे, महेंद्र बाविस्कर,अतिष झाल्टे,प्रमोद वाघ,सुधाकर माळी,सुहास पाटील,नाजीम शेख,खलील शेख,विलास पाटील,अमित देशमुख,रामेश्वर पाटील,नाना वाणी, सुरेश बोरसे,रामण चौधरी,गोपाल नाईक,संजय देशमुख,बाबुराव घोंगडे आदी उपस्थित होते.खा.रक्षा खडसे म्हणाल्या की ना.महाजन यांनी प्रत्येक गावासाठी काम केले आहे.सर्व सामान्य लोकांच्ये काम त्यांनी केले आहे.त्यासाठी आता विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने कार्यकर्त्यांनी स्वतः जबाबदारी स्विकारुन काम केले पाहिजे.भारतीय जनता पार्टीला मजबूत करणे आपले काम आहे संघटन मजबूत असले की जास्तीत जास्त जागेवर आपण निवडून येतो.असा सुचक इशारा त्यांनी दिला.
यावेळी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी लोकसभेत तालुक्यात खा.रक्षा खडसे यांना कोणत्या गावातून कोणत्या बुथ वरून किती मतदान मिळाले याची सविस्तर माहिती दिली.तसेच विधानसभा निवडणूका जवळ आल्याने पक्षाने आखलेल्या कामांची सविस्तर माहिती व तालुकाभारातील बैठकीचे नियोजन या वेळी करण्यात आले.
तसेच प्रा.सुनील नेवे,महेंद्र बाविस्कर,गोविंद अग्रवाल यांनी देखील मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवलसिंग पाटील यांनी तर सुत्रसंचालन रवींद्र झाल्टे यांनी केले.

