चाळीसगाव | तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कनेक्शन तोडण्यात आले आणि त्यामुळे संतप्त शेतकरी वीज मंडळाच्या कार्यालयावर जाब विचारण्यासाठी धावून गेलेत पुरेसे समाधान न मिळाल्यामुळे भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी वीज अधिकाराला चक्क खुर्चीला बांधले जोपर्यंत वीज कनेक्शन जोडण्यात येणार नाही तोपर्यंत तुम्हाला या कार्यालयातून बाहेर जाता येणार नाही अशी भूमिका आमदारांसह सर्वच शेतकऱ्यांनी घेतली होती.
दरम्यान सात हजार लोकांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले असून शेतकर्यांच्या विजेच्या समस्यांचे निराकरण झालेले नाही. यामुळे संतप्त झालेले आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांसह वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयात धडक दिली. त्यांनी जाब विचारत अधिकार्याला खुर्चीला बांधून बाहेर आणले. आंदोलन सुरू असताना पोलीस धडकले आमदारांसह सर्व शेतकरी आवाक झाले पोलीस उपस्थित झाले असता आमदार स्वत:हून गाडीत बसले. तर नंतर त्यांनी वीज मंडळाच्या कार्यालयास कुलूप बांधले.
व्हिडीओ पाहा :