मुंबई : विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी दिलीप वळसे यांची नियुक्ती करण्यात अली आहे. विधानसभेचं अध्यक्षपद कोणाकडे जाणार? याची चर्चा चांगलीच रंगली होती. ज्यानंतर आता हे पद राष्ट्रवादीकडे गेलं आहे.
राज्यातील सत्तापेच सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने ३० नोव्हेंबरची मुदत कमी करत २७ नोव्हेंबर रोजी फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगितले होते. त्यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी कालिदास कोळंबकर यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र बहुमत नसल्याने फडणवीस यांनी राजीनामा दिला होता. दरम्यान राज्यात महाआघाडीचं सरकार स्थापन झालं विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, आज मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले आणि त्यांनी पदभार स्वीकारला. मंत्रालयात त्यांना पाहण्यासाठी गर्दी झाली होती. त्याच दरम्यान दिलीप वळसे पाटील यांची हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील यांची निवड करण्यात आली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या नव्या सरकारला ३ डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत आहे. अर्थात फार वेळ न दवडता ताबडतोब विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याचा नव्या सरकारचा मानस आहे. शनिवारी बहुमत चाचणीसाठी विधानसभेचे सत्र होणार आहे.