वादळाची तिव्रता अजून सात तास राहणार

0

मुंबई (प्रतिनिधी): निसर्ग चक्रीवादळ आता समुद्रावरील जमिनीवर झेपावत असल्यामुळे आगामी सात तास त्याची तिव्रता मोठी राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

अलिबागला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हे चक्रीवादळ धडकले त्यानंतर ते मुंबई व ठाणेच्या दिशेने पुढे सरकले आहे.या वादळाच्या परिघापैकी ाकही भाग अजूनही समुद्रावर आहे. हे वादळ ज्यावेळी पुर्णपणे जमिनीवर दाखल होईल त्यावेळी नुकसानीची शक्‍यता अधिक वाढणार आहे.

मुंबई परिसरात पावसाचा जोर वाढत चालला आहे. त्याचबरोबर वादळी वारे सुद्धा वेगाने वाहत आहेत. सध्या वाऱ्याचा वेग हा ताशी 90 ते 100 किलोमीटर इतका आहे.आगामी काळात तो थोडा कमी होईल पण पावसाचा जोर मात्र पुढील सात तास तरी कायम राहणार आहे.त्यानंतर हे वादळ ईशान्य दिशेला वळणार असल्याने त्याची तिव्रता कमी होईल. असे ही हवामान विभागाने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.