चाळीसगाव (प्रतिनिधी) :- चाळीसगाव तालुक्यातील वाघडू शिवारात देवराम नंदाराम पाटील वय (७०) हे आपल्या शेतात असलेल्या झोपडीस लागलेल्या आगीमुळे जळून मृत्यूमुखी पडले.
या बाबतीत समजलेली माहिती अशी की, देवराव नंदाराम पाटील हे जवळपास १५ वर्षांपासून शेतातच झोपडी बांधून रहात होते,काल रात्री अचानक थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने त्यांनी झोपडी जवळ शोकोटी पेटवली. वाऱ्याच्या झुळकाने झोपडीस अचानक लागलेल्या आगीत देवराम पाटील यांचा जळून मृत्यू झाला.
या घटनेनंतर चाळीसगाव चे आमदार मंगेश चव्हाण यांनी लगेच घटनास्थळी भेट देवून चाळीसगावचे तहसीलदार अमोल मोरे यांना घटनास्थळी तात्काल भेट देऊन तातडीने पंचनामा करून मदत करण्याचे आदेश दिले.