वाकडी येथील घटना दुर्दैवी -पालकमंत्री

0

पालकमंत्र्यानी वाकडी येथे जाणे टाळले
जळगाव;- जामनेर तालुक्यातील वाकडी येथील घटना हि दुर्दैवी असून हि घटना जातीय नसून शरमेने मान घालावी अशी हि घटना आहे . हे विकृत मनस्थितीचे लक्षण आहे . या घटनेचे समर्थन होऊ शकत नाही. पोलिसांनी आरोपीना अटक केली असून त्यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्र्कांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले . दोन जणांना अमानुष मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली असून राज्यातच नाही तर संपूर्ण देशात या घटनेबद्दल तीव्र पडसाद उमटत असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील जळगाव दौऱ्यावर आले असता त्यांनी वाकडी येथे भेट देणे टाळले . दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वाकडी येथे भेट देऊन पीडित कुटुंबियांना २५ हजारांची मदत दिली . तसेच बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती/जमाती आयोगाचे अध्यक्ष मा. विजयकुमार कांबळे, सदस्य (विधी) आदींनी भेट घेतली .

Leave A Reply

Your email address will not be published.