वाकडी गावातील मारहाण झालेल्या मुलांची केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली भेट

0

आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासन देत पीडितांना केली आर्थिक मदत

भुसावळ ;- – जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकडी या गावात विहिरीत पोहल्यामुळे अमानुष मारहाण करण्यात आलेल्या सचिन चांदणे आणि राहुल चांदणे या मातंग समाजाच्या मुलांची व त्यांच्या कुटुंबियांची आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी भेट घेतली. पीडित मुलांना सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने 1 लाख रुपयांची मदत तसेच रिपब्लिकन पक्षातर्फे 50 हजारांची मदत देण्यात आली. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत या मुलांना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सांगणार असल्याचे तसेच येथिल मातंग समाजाच्या कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ना रामदास आठवलेंनी यावेळी दिले. वाकडी गावास आज सकाळी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट देऊन पीडितांच्या कुटुंबियांना तसेच सर्व ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी; तहसीलदार पोलीस प्रधासनाचे अनेक अधिकारी वर्ग उपस्थित होते तसेच रिपब्लिकन पक्षाचे शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
विहिरीत पोहल्यामुळे मातंग मुलांना मारहाण झाल्याची घटना 10 जुन रोजी घडली त्यानंतर दि 13 जून या मुलांच्या आईने पोलीस तक्रार दाखल केली व सोशल मीडियात मारहाणीचा व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. संपूर्ण गावातील ग्रामस्थ हे आरोपींच्या विरोधात आहेत. त्यांची मातंग समाजाच्या पीडित मुलांबद्दल सहानुभूती आहे. त्या विहिरीचा मालक हा भटक्या विमुक्त समाजाचा ईश्वर बळवंत जोशी आणि त्याचा मदतगार लोहार हा ओबीसी समाजाचा आहे.या आरोपींनी केलेले कृत्य अत्यंत निंदनीय निषेधार्ह आहे त्यांनी मातंग मुलांना केलेली अमानुष मारहानीमुळे त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी पोलिसांना निर्देश देण्यात आले असून या प्रकरणी पालक मंत्री गिरीश महाजन ; आमदार एकनाथ खडसे यांच्याशी आपण बोललो असून मुख्यमंत्र्यांना ही याप्रकरणी भेटणार असल्याचे ना रामदास आठवलेंनी सांगितले.

या प्रकरणातील मातंग समाजाच्या कुटुंबियांच्या मनात भीती असून त्यांना पोलिसांनी संरक्षण द्यावे आणि आरोपिंना कठोर शिक्षा करावी;आरोपी सुटता कामा नयेत असे पोलिसांना निर्देश देण्यात आले असून सरकार या मातंग समाजाच्या कुटुंबियांसोबत भक्कम आहे याप्रकरणावरून काँग्रेस ने चुकीचे राजकारण खेळू नये या प्रकरणा ला दलित सवर्ण जातीवादाचा रंग काँग्रेसने दिल्यामुळे महाराष्ट्राची नाहक बदनामी झाली आहे.मातंग मुलांवर मारहाणीचा झालेली घटना गंभीर आणि निषेधार्ह आहे असे ना रामदास आठवलेंनी म्हणाले.


वाकडी गावास भेट दिली त्यावेळी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या समवेत रिपाइं चे प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम; मिलिंद शेळके ;उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे ,वि.अध्यक्ष लक्षिमण जाधव उ.म.सचिव रविंद्रनाथ तायडे जिल्हाध्यक्ष आनंद बाविस्कर,लोकसभा क्षेत्रप्रमुख आनंदजी खरात जामनेर तालुकाध्यक्ष भगवान सोनवणे युवा जिल्हासरचिटणीस मिलिंद तायडे.महानगर अध्यक्ष अनिल अड़कमोल जिल्हाउपाध्यक्ष नितीन ब्राम्हणे एरंडोल तालुकाध्यक्ष प्रवीण बाविस्कर यावल तालुकाध्यक्ष अरुण गज़रे युवा यावल तालुकाध्यक्ष संजय तायडे युवा नेते पप्पू सुरडकर यावल शहर अध्यक्ष भिमराव गजरे उपाध्यक्ष श्याम इंगळे प्रसिद्धि प्रमुख शांताराम तायडे उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.