भडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील वडजी येथील एका भिल्ल आदिवासी कुटुंबाच्या झोपडीला अचानक आग लागून झोपडी व संसारउपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. त्यामुळे या कुटुंबाका संसार उघडय़ावर आला आहे. प्रशासनाने या कुटुंबाला तातडीने मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
वडजी येथे भिल्ल वस्तीतील रहीवाशी मोहन भिल्ल याच्यां राहत्या झोपडीला अचानक आग लागली. त्यात झोपडी पुर्णपणे जळून खाक झाली. पती पत्नी दोघंही मजुरीसाठी बाहेर कामाला गेले होते. या आगीत घरातील सर्व साहीत्य जळून खाक झाले. अन्नधान्यासह कपडे, टीव्ही , भांडे आदि वस्तु जळाल्याने या कुटुंबाचा संसार अक्षरश: उघड्यावर आला आहे. जळालेला संसार पाहून सुनंदा भिल्ल यांच्या डोळ्यात अश्रूनी घर केले होते. आगीचे कारण समजु शकले नाही. तलाठी विलास शिंदे यांनी घटस्थळी येऊन पंचनामा करून अवहाल तहसिल कार्यालयात सादर केल्याचे सांगण्यात आले.
यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या जिकरीने ही आग आटोक्यात आणली. यावेळी वडजी ग्रामपंचायतीचे सदस्य समाधान पाटील, सुधाकर पाटील, स्वदेश पाटील यांनी भेऊन मदत मिळवून देण्थासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. सुधाकर पाटील यांनी तहसिल सागर ढवळे यांना यासंदर्भात माहीती देऊन तत्काळ मदत देण्यासंदर्भात विनंती केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मदत लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगीतले..तर महसुल विभागाकडुन या कुटुंबाला कीराणा उपलध्द करू देऊ असे सांगीतले.