अन्न भेसळ प्रशासनाने तपासणी करावी ; ग्रामस्थांची मागणी
लासुर ता.चोपडा (वार्ताहर) :-येथे उन्हाळ्यात मागील 3 ते 4 वर्षापासून उत्तरप्रदेश म्हणून तसेच इतर राज्यातून थंडपेय (आईस्क्रीम) चा व्यवसाय करण्यासाठी काही भैया लोक येत असतात. तप्त उन्हामुळे गावात त्यांना भरघोस असा प्रतिसाद देखील मिळत असतो.पण आता काही ग्रामस्थांनी त्यांची प्राथमिक चौकशी केली असता ते आईस्क्रीम मध्ये भेसळ करत असल्याचे उघड झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की लासुर गावात आईस्क्रिम चे 3 दुकाने असून ते जास्त नफा कमावण्यासाठी भेसळ करून लोकांचा जीवाशी खेळत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली.आईस्क्रीम मध्ये भेसळ म्हणून कस्टर्ड पावडर,बटाटे,मुरमुरे,दूध पावडर,सेंट,सॅक्रीन असे पदार्थ मिसळून व्यवसाय करत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला.त्यांचा या भेसळ कारभारामुळे गावातील नागरिकांना तसेच चिमुकल्यांना सर्दी,खोकला,ताप असे विविध आजाराची लागण होत आहे.तरी संबंधित प्रकरणाची अन्न भेसळ प्रशासनाने चौकशी करून त्यांचा नमुन्यांची तपासणी व्हावी तसेच कोरोना रोगाला थंड पदार्थ अपायकारक असून त्यांचा दुकानांवर बंदी आणावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.
लासुर गावात उत्तरप्रदेश येथील भैय्यालोक आईस्क्रीम चे दुकान चालवत असून आम्ही चौकशी केली असता ते भेसळजन्य पदार्थाचा वापर आईस्क्रीम बनवण्यासाठी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.ज्यापासून गावातील नागरिकांचा आरोग्य धोका आहे.तरी अन्न भेसळ प्रशासनाने याबाबत चौकशी करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे
-गणेश जैस्वाल (ग्रामस्थ लासुर)