रावेर तालुक्यातील १३ गावांना अस्मानी संकटाचा तडाखा

0

शेतक-यांच्या ९२० हेक्टरक्षेत्रावरील केळीचे सुमारे ७० कोटी रुपयांचे नुकसानीचा अंदाज

रावेर;- तालुक्यात काल सायंकाळी मान्सुनपुर्व पावसासह जोरदार वादळाचा तडाखा बसला. अस्मानी संकटाच्या या तडाख्यात तालुक्यातील तेरा गावांच्या शेती शिवारातील केळी जमीनदोस्त होवुन  सुमारे सत्तर कोटी रुपयांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज  अहवाल  तयार करण्यात आला आहे. दरम्यान आज आमदार हरिभाऊ जावळे, माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या सह आधिकारी यांनी नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली.

या बाबतचे वृत असे की, काल दि. १ जुन शुक्रवार रोजी तालुक्यातील  तालुक्यातील  के-हाळे बुद्रुक केर्‍हाळे खुर्द आहिरवाडी, कर्जोद, पाडळे आदी भागात सर्वाधिक नुकसान झालेले आहे तसेच मंगरूळ, मोहगण, पिंप्रि, मुंजलवाडी, निरूळ अजनाड, रावेर, रसलपुर,  आदी  गावांना अवकाळी पावसासह जोरदार वादळाचा तडाखा बसला . वादळाच्या या तडाख्यात या  गावातील १०१५ शेतक-यांच्या ९२० हेक्टर शेती क्षेत्रा वरील केळीचे सुमारे ६० कोटी ७२ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज अहवाल महसुल व कृषी विभागा मार्फत सादर करण्यात आलेला आहे. वादळामुळे या परीसरात तसेच अंकलेश्वर ब-हाणपुर राज्य महामार्गावर ठीकठीकाणी झाडे उन्मळुन पडली.

वादळमुळे तालुुुक्यातील पाडळे येथे घरांची पडझड होवून  सहा हजारांचे रुपयांंचे  नुकसान झाले आहे. तर याच वेळी विद्युत तार तुटून दोन बैलांच्या अंगावर पडल्याने ते दगावले. याबाबत महसूल विभागाने एक लाख २० हजार रुपये किमतीचा पंचनामा केला आहे.

दरम्यान या तेरा गावात अस्मानी संकटामुळे केळीच्या झालेल्या अतोनात नुकसानी बाबत महसुल व कृषी विभागा मार्फत पंचनामे करण्याचे काम सुरु आहे.हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाच्या या तडाख्याने हिरावला गेल्याने हे केळी उत्पादक शेतकरी कमालीचे हवालदिल झालेले आहेत . शासनाने पंचनाम्यांचे काम तातडीने पुर्ण करुन अपादग्रस्रत शेतक-यांना त्वरीत भरीव मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान आज आमदार हरीभाऊ जावळे, माजी आमदार शिरीष चौधरी, प्रांताधिकारी डाॅ. अजित थोरबोले, तहसिलदार विजयकुमार ढगे, यांनी नुकसानग्रस्त भागास भेट देवुन पहाणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.